शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये आज मतमोजणी; सत्ताधारी भाजपाला 'एक्झिट'ची धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 08:05 IST

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही.

रांची : झारखंड विधानसभेच्या 81 जागांवर झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार असून सत्ताधारी भाजपाला एक्झिट पोलमुळे धडकी भरली आहे. 

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मात्र, तिथे कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि विधानसभा त्रिशंकू असू शकेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजामुळे भाजपचे नेते अस्वस्थ दिसत आहेत.

झारखंडमधील विधानसभेच्या ९१ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान झाले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांना मिळून ३८ ते ५0 जागा मिळू शकतील. सध्या सत्तेत असलेल्या भाजप व मित्रपक्षांना मिळून २२ ते ३२ जागा मिळू शकतील, असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. राज्यातील आॅल झारखंड स्टुडंटस् युनियन (एजेएसयू) ला ३ ते ५, झारखंड विकास मोर्चाला २ ते ४ आणि अन्य यांना ४ ते ५ जागा मिळू शकतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. अर्थात यातील काही पक्षांच्या मदतीनेच भाजपने २0१४ साली सरकार स्थापन केले होते. भाजपला २0१४ सालीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे यावेळीही भाजप या पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न करील. त्यापैकी एजेएसयू हा पक्ष सरकारमध्ये भाजपसह सहभागी होता; पण त्या पक्षाने निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढवली.

आयएएनएस-सी व्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला मिळून ३१ ते ३९, तर भाजप व मित्रपक्षांना मिळून २८ ते ३६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला आहे. एजेएसयूला ७, तर विकास मोर्चाला १ ते ४ जागा मिळतील, असे या पोलमधून दिसते. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा, काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता, की लहान पक्षांना आयत्या वेळी आपल्याकडे खेचून पुन्हा भाजप, अशी चर्चा सुरू झाली आहे. आदिवासीबहुल झारखंडमध्ये भाजपने रघुबर दास या बिगर आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री केल्याने राज्यात नाराजी होती. त्यामुळे लोकांनी यंदा भाजपकडे पाठ वळवली, असे एक्झिट पोल सांगतात. 

झारखंडमध्य़े 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यांत 81 जागांसाठी मतदान झाले होते. नक्षलग्रस्त राज्य असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. 1215 उमेदवारांच्या भविष्याचा निकाल आज लागणार आहे. सर्वात आधी तोरपा आणि चंदनकियारी या जागांचे निकाल येणार आहेत कारण या जागांची मतमोजणी 13 टप्प्यात तर अन्य जागांवर 28 टप्प्यांत मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा