शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

झारखंडमध्ये आज मतमोजणी; सत्ताधारी भाजपाला 'एक्झिट'ची धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 08:05 IST

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही.

रांची : झारखंड विधानसभेच्या 81 जागांवर झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार असून सत्ताधारी भाजपाला एक्झिट पोलमुळे धडकी भरली आहे. 

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मात्र, तिथे कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि विधानसभा त्रिशंकू असू शकेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजामुळे भाजपचे नेते अस्वस्थ दिसत आहेत.

झारखंडमधील विधानसभेच्या ९१ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान झाले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांना मिळून ३८ ते ५0 जागा मिळू शकतील. सध्या सत्तेत असलेल्या भाजप व मित्रपक्षांना मिळून २२ ते ३२ जागा मिळू शकतील, असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. राज्यातील आॅल झारखंड स्टुडंटस् युनियन (एजेएसयू) ला ३ ते ५, झारखंड विकास मोर्चाला २ ते ४ आणि अन्य यांना ४ ते ५ जागा मिळू शकतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. अर्थात यातील काही पक्षांच्या मदतीनेच भाजपने २0१४ साली सरकार स्थापन केले होते. भाजपला २0१४ सालीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे यावेळीही भाजप या पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न करील. त्यापैकी एजेएसयू हा पक्ष सरकारमध्ये भाजपसह सहभागी होता; पण त्या पक्षाने निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढवली.

आयएएनएस-सी व्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला मिळून ३१ ते ३९, तर भाजप व मित्रपक्षांना मिळून २८ ते ३६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला आहे. एजेएसयूला ७, तर विकास मोर्चाला १ ते ४ जागा मिळतील, असे या पोलमधून दिसते. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा, काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता, की लहान पक्षांना आयत्या वेळी आपल्याकडे खेचून पुन्हा भाजप, अशी चर्चा सुरू झाली आहे. आदिवासीबहुल झारखंडमध्ये भाजपने रघुबर दास या बिगर आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री केल्याने राज्यात नाराजी होती. त्यामुळे लोकांनी यंदा भाजपकडे पाठ वळवली, असे एक्झिट पोल सांगतात. 

झारखंडमध्य़े 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यांत 81 जागांसाठी मतदान झाले होते. नक्षलग्रस्त राज्य असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. 1215 उमेदवारांच्या भविष्याचा निकाल आज लागणार आहे. सर्वात आधी तोरपा आणि चंदनकियारी या जागांचे निकाल येणार आहेत कारण या जागांची मतमोजणी 13 टप्प्यात तर अन्य जागांवर 28 टप्प्यांत मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा