शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

"निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार; ईडी बनलीय गुन्हेगारांची टोळी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:15 IST

प्रशांत भूषण : सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकरणाची चौकशी हवी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि खंडणीखोरी झाली आहे. हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. मात्र, ही चौकशी सीबीआय किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांमार्फत होऊ नये. तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली. 

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या कॉ. सुरेश धोपेश्वरकर व्याख्यानमालेत ‘निवडणूक रोखे - भारतीय लोकशाहीसमोरील एक आव्हान’ या विषयावर भूषण बोलत होते. यावेळी नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशनचे समन्वयक शैलेश गांधी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज, बँक कर्मचारी संघटनेचे प्रा. देवीदास तुळजापूरकर आदी उपस्थित होते. नागरिकांकडून माहितीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावला जात आहे. मात्र लोकांना त्याची जाणीव नाही, अशी खंत शैलेश गांधी यांनी व्यक्त केली. 

भूषण म्हणाले...    भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कंपन्यांनी दिले. त्यानंतर कंपन्यांना जवळपास ३ लाख ६ हजार कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली.     निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे मिळाल्यावर सरकारी धोरणातही बदल झाले आहेत. त्याची अनेक उदाहरणे आहेत.    देशातील २५ नेत्यांविरोधात ईडी, आयटी या केंद्रीय संस्थांच्या कारवाया सुरू होत्या. मात्र या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर २३ नेत्यांच्या केसेस माघारी घेण्यात आल्या.     ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी दिल्यावर कारवाया थंडावल्या.    दिल्ली मद्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या ऑरोबिंदो फार्मा कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. त्यानंतर त्या कंपनीच्या संचालकाला माफीचा साक्षीदार केले. - या मुख्य आरोपीच्या केवळ जबाबावर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अशा पद्धतीने आरोपीच्या जबाबावर मुख्यमंत्र्यांना अटक केली जाऊ शकत नाही.

‘ईडी बनलीय गुन्हेगारांची टोळी’सरकारी धोरणे बदलण्यासाठी आणि विविध कंत्राटे मिळविण्यासाठी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून लाचखोरी करण्यात आली आहे. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांना ९० टक्के रोखे मिळाले. यातील ५० टक्के रोखे हे एकट्या भाजपला मिळाले आहेत. ईडी ही संघटित गुन्हेगारांची टोळी बनली असल्याचा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी रविवारी केला. भूषण आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी पत्रपरिषदेत एसआयटी चौकशीची मागणी करताना म्हटले की, निवडणूक रोख्यांतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीसाठी आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Courtन्यायालयElectionनिवडणूक