्रपोलीस अधीक्षकांची सही ठोकली बोगस!
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30
सही अन् नावही बोगस: कारवाई कोणी करायची यावरून झेड़ पी़ अन् ग्रामीण पोलिसांत तू-तू मैं-मैं

्रपोलीस अधीक्षकांची सही ठोकली बोगस!
स ी अन् नावही बोगस: कारवाई कोणी करायची यावरून झेड़ पी़ अन् ग्रामीण पोलिसांत तू-तू मैं-मैं सोलापूर: शिवाजी सुरवसे तीर्थक्षेत्राचे अनुदान लाटण्यासाठी एका ग्रामपंचायतीने चक्क पोलीस अधीक्षकांचे आणि पोलीस निरीक्षकांचे नाव आणि सही बोगस ठोकून जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला़ जि़ प़ने तो स्वीकारला़ एका कागदावर पोलीस अधीक्षकांची सही ‘चुकून’ राहिली म्हणून जि़प़ने ती कागदपत्रे पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठविली़ मात्र ‘शांताराम चव्हाण- पोलीस अधीक्षक’ अन् ‘गोपाळराव पाटील- पोलीस निरीक्षक’ अशी नावे वाचून अधीक्षक कार्यालय चक्रावल़े एवढेच नव्हे तर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी देखील हा प्रकार पाहिला; मात्र कारवाई कोणी करायची, यावर झेड़ पी़ अन् एस़ पी़ कार्यालयात महिन्यापासून तू-तू मैं-मैं सुरू आह़े तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून त्या गावाला शासनाचे अनुदान देण्यासाठी गावाकडून किंवा त्या देवस्थानकडून जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला जातो़ यामध्ये त्या देवस्थानला यात्रेनिमित्त किती भाविक येतात, याची संख्या दर्शविणारा दाखला पोलीस अधीक्षकांनी द्यावा लागतो़ मात्र प्रस्तावासोबत भलतीच करामत केली आह़े शांताराम चव्हाण असे पोलीस अधीक्षकांचे नाव लिहून तर गोपाळराव पाटील असे तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे नाव लिहून त्यावर बोगस स?ा ठोकून प्रस्ताव दिला होता़ मात्र पोलीस निरीक्षकांच्या सहीच्या ठिकाणी देखील पोलीस अधीक्षकांचीच सही लागते म्हणून जि़ प़ने ‘डोळेझाक’पणे काहीही न पाहता ती दोन पत्रे पोलीस अधीक्षकांना पाठवून दुसर्या प्रतीवर देखील आपली सही करून द्यावी, असे कळविल़े इथपर्यंत कोणालाही थांगपत्ता लागला नाही; मात्र ही दोन्ही नावे बोगस आहेत आणि स?ा देखील बोगस ठोकल्याचे समजल्यावर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी जि़ प़ला केवळ पत्र देऊन कारवाई करा, असे सुचविले आह़े त्यामुळे या प्रकरणावर अद्याप तरी काहीही झाले नाही़ चौकट़़़झेड़ पी़तून फाईल गायबतो प्रस्ताव कार्यकारी अभियंता बांधकाम क्रमांक 1 कडे दाखल होता़ मात्र बोगस स?ा मारल्याचे बिंग फुटल्यामुळे जिल्हा परिषदेतून हा प्रस्तावच गायब केल्याचे समजत़े वास्तविक पाहता आम्ही त्या ग्रामपंचायतीला अनुदान दिले नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली नाही, असे जि़ प़ अधिकार्यांचे म्हणणे आहे तर बोगस कागदपत्रे झेड़ पी़कडे सादर झाली. त्यामुळे त्यांनीच कारवाई करावी, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाचे म्हणणे आह़े यामुळे वरिष्ठ अधिकारी किती गंभीर आहेत हे दिसत़े चौकट़़़पोलीस अधीक्षकांकडून झेड़ पी़ला पत्रया गंभीर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितल्यानुसार झेड़ पी़ कडे कारवाईबाबत टपाली पत्र पाठविण्यात आले आह़े महिना झाला तरीही याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून दुसरे पत्र पाठविले आह़े आता झेड़ पी़ने कारवाई केली नाही तर पोलीस अधीक्षक गप्प बसणार का, हा खरा प्रश्न आह़े