शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मूळ गावी परतलेल्या मजुरांचा मुक्काम वडाच्या झाडावर; झोपड्या लहान असल्याने अनोखे ‘क्वारंटाईन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 06:17 IST

स्थलांतरित मजुरांनी ‘होम क्वारंटाईन’चे बंधन पाळण्यासाठी एका आठवड्यापासून गावाबाहेरच्या वडाच्या झाडावर मुक्काम करून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

कोलकाता : सध्याचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ सुरू होण्याआधी केरळमधून बाहेर पडून प. बंगालच्या पुरुलिया या अत्यंत मागास जिल्ह्यातील मूळ गावी परत आलेल्या ७ स्थलांतरित मजुरांनी ‘होम क्वारंटाईन’चे बंधन पाळण्यासाठी एका आठवड्यापासून गावाबाहेरच्या वडाच्या झाडावर मुक्काम करून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

परदेशातून परत आलेल्या अनेक शहरी व सुशिक्षित नागरिकांनी ‘सोशल डिन्स्टन्सिंग’ न पाळल्याने कुटुंबातील व परिसरातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आलेल्या असताना बंगालमधील या अशिक्षित मजुरांचे शहाणपण नक्कीच अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे.

हे सातही मजूर गेल्या सोमवारी पुरुलिया जिल्ह्यातील बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांगडीडीह या त्यांच्या मूळ गावी परत आले. तेव्हापासून त्यांनी गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण वडाच्या झाडावर मुक्काम ठोकला आहे. त्यासाठी त्यांनी लाकडी खाटा (चारपायी) झाडाच्या फांद्यांना घट्ट बांधल्या आहेत.

घरचे लोक त्यांचे जेवण घेऊन येतात व ते झाडाखाली ठेवून दूर जाऊन बसतात. हे सातही जण झाडावरून खाली उतरतात, जेवतात व बाजूने बाहणाऱ्या ओढ्यावर साबणाने भांडी स्वच्छ घासतात व ती आणून पुन्हा झाडाखाली ठेवतात. घरून येणाºया किंवा गावातून येणाºया अन्य कोणाचाही या सात जणांशी अजिबात संपर्क येणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली जाते.

या सात जणांपैकी एक बिजय सिंह याने सांगितले, की गेल्या शनिवारी आम्ही चेन्नई येथे रेल्वेत बसलो व रविवारी खडगपूरला पोहोचलो. रेल्वे स्थानकात डॉक्टरांनी आमची सर्वांची तपासणी केली. कोणालीही कोरानाची लक्षणे दिसली नाहीत; पण तरीही डॉक्टरांनी १४ दिवस घरीच पूर्णपणे वेगळे (होम क्वारंटाईन) राहण्यास सांगितले. गावातील आमच्या सर्वांच्या झोपड्या खूपच लहान आहेत.

डॉक्टरांचा सल्ला आम्हाला मनापासून पटला; पण घरातच इतरांपासून वेगळे कसे राहायचे, असा आम्हाला प्रश्न पडला. खडगपूरहून गावी परत येत असताना खूप विचार केला आणि ही शक्कल सुचली. गावकऱ्यांनी चारपायी, अंथरुण-पांघरूण, दोºया, मच्छरदाण्या वगैरे सामान आम्हाला आणून दिले आणि आम्ही वडाच्या झाडावर बिºहाड थाटले.

या मजुरांच्या आणि गावकºयांच्या समजूतदारपणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे सांगून त्या भागाचे ‘बीडीओ’ ध्रुवपद शांडिल्य म्हणाले की, प्रशासन या गावाला कशा प्रकारे बक्षिस देता येईल, यावर विचार करत आहे.

सुगीचा हंगाम व श्वापदे

अयोध्या डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या या गावात सध्या सुगीचा हंगाम चालू आहे. गावात सर्वांच्या घराबाहेरच्या खळ्यांमध्ये कापणी केलेले पीक आणून टाकलेले आहे. त्यामुळे जंगलातून येणारे बिबटे, हत्ती, रानडुकरे व कोल्हे अशा श्वापदांचा गावात सध्या सुळसुळाट आहे. त्यामुळे गावाबाहेर उघड्या जमिनीवर राहणे धोक्याचे असल्याने या मजुरांनी उंच झाडावर राहण्याचे ठरविले. तरीही, चार-पाच गावकरी हातात धनुष्यबाण घेऊन आळीपाळीने रात्री झाडाखाली पहारा देत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत