शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

coronavirus : मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार; लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:51 IST

देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ठळक मुद्देदेशव्यापी लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यतापंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपू्र्ण बदल होण्याची शक्यता आहे. आवश्यक सेवा वगळून आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्थिक मंदीचा विचार करता काही विशिष्ट्य क्षेत्रातील उद्योगांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. 

कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्ती आली आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण अहवालात म्हटले आहे.  लॉकडाऊनमुळे विमान वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाच्या पालनासह देशातील हवाई वाहतुकीला परवानगी मिळू शकते. दरम्यान, बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन हटवणे शक्य नसल्याचे म्हटले होते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करण्यास पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असल्याचे सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालेल्या काही नेत्यांनी सांगितले होते. तसेच कोरोनाची साथ येऊन गेल्यानंतर देशातील जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. तसेच जनतेला आपले वैयक्तिक आचरण आणि सामाजिक आचरणात बदल करावे लागतील,  असे मत या नेत्यांनी मांडले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत