शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

Coronavirus: कोरोनाची चौथी लाट सौम्य असेल की तीव्र? देशात कशी असेल परिस्थिती, तज्ज्ञांनी केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:36 IST

Coronavirus in India: गेल्या काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर भारतात कोरोनाचा संसर्ग नाममात्र शिल्लक राहिला आहे. मात्र आता जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर भारतात कोरोनाचा संसर्ग नाममात्र शिल्लक राहिला आहे. मात्र आता जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कानपूर आयआयटीचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी सर्व शक्यतांना पूर्णविराम देताना आपल्या गणितीय मॉडेलच्या सूत्रानुसार सांगितले की, भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रभाव दिसणार नाही. जर कोरोनाची चौथी लाट आलीच तर ती तिसऱ्या लाटेप्रमाणे कमकुवत असेल. प्राध्यापण मणिंद्र अग्रवाल यांनी आतापर्यंत कोरोनाबाबत जे दावे केले आहेत, ते अगदी अचूक सिद्ध झाले आहेत.

प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये नॅचरल इम्युनिटी विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट आलीच तकी बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी असेल. प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार चौथी लाट येण्याची शक्यता नाही आहे. मात्र विषाणुच्या म्युटेंटमध्ये काही बदल झाला तर परिस्थिती बदलू शकते.

प्राध्यापक अग्रवाल यांनी आपल्या गणितीय मॉडेलच्या सूत्रानुसार कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेदरम्यान, ओमायक्रॉन वेगाने पसरत होता. या म्युटेंटने व्हॅक्सिनपासून निर्माण झालेल्या इम्युनिटीलाही बायपास केले होते. मात्र नॅचरल इम्युनिटीला बायपास करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये ओमायक्रॉनमुळे केवळ ११.८ टक्के लोकांनाच संसर्ग झाला होता. तर ग्रीसमध्ये सर्वाधिक ६५.१ टक्के लोकांना संसर्ग झाला होता. ज्या देशांमध्ये नॅचरल इम्युनिटी अधिक विकसित झाली होती. तेथील लोकांना कमी प्रमाणात संसर्ग झाला होता. दरम्यान, चीन दक्षिण कोरियासह युरोपमधील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रकोप दिसून येत आहे. चीनमधील शांघाईमध्ये तर लॉकडाऊन लावावे लागले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य