शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

coronavirus: ना पॅकेज, ना प्लॅन; १७ मेनंतर करणार काय? सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:07 IST

लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

ठळक मुद्दे17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे,कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 17 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.   

यावेळी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आपली मते मांडली. कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तसेच या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.  

या बैठकीला उपस्थित असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राज्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी केली.  ‘ जोपर्यंत व्यापक मदत पॅकेज दिले जात नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालेल. आम्ही १० हजार कोटींचा महसूल गमावला आहे. राज्य सरकारांना मदतीबाबत पंतप्रधानांना वारंवार विनंती केली. पण पंतप्रधानांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले.  

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉकडाऊन ३.० नंतर काय? सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या धोरणाबाबत माहिती असले पाहिजे.’

दरम्यान, या बैठकीस उपस्थित असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. तर राज्याला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. तर पंजाबप्रमाणेच पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी कोरोनाच्या झोननुसार विभागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी