शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

coronavirus: मणिपूरमध्ये गावकऱ्यांनी ‘क्वारंटाइन’साठी बनवले ८० बांबू सेंटर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:30 IST

लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते

मणिपूर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेले मजूर, नागरिक आता आपापल्या राज्यात दाखल होत आहेत. मात्र, बाहेरच्या राज्यांतून आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवस्था असावी, म्हणून येथील गावकऱ्यांनी बांबूच्या साह्याने ८० झोपड्या तयार केल्या आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते, याचा अंदाज घेऊन येथील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बांबूच्या झोपड्या सुरक्षित अंतर ठेवून तयार केल्या आहेत.बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांमधून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पुरेशी काळजीदेखील घेण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या झोपड्यांना ‘क्वारंटाइन सेंटर’ असे नाव दिले आहे. त्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.डॉ. जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या सेंटरमध्ये एक बेड, स्वतंत्र प्रसाधनगृह, गॅस टेबल, वीज, पाणी आणि चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी क्वारंटाइन होणाºया नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत