शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 07:04 IST

सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जातत्यासाठी राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जातया राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापैकी हटवण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. मात्र प्रवासाच्या साधनांवर सध्यातरी मर्यादा असल्याने प्रवास आणि दळणवळण अद्यापतरी अडचणीचे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १०० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी या रेल्वे गाड्या जिथून सो़डल्या जातील आणि जिथे पोहोचतील अशा राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे. या राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती प्रवक्त्याने दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील.रेल्वेकडून सध्या देशभरात २३० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यामध्ये कामगारांची मागणी वाढत आहेत. त्यामुळे अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत. सद्यस्थितीत सप्टेंबर महिन्यासाठीची रेल्वेची सर्व तिकिटे बूक झालेली आहेत. बिहार, बंगाल, ओदिशा, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि अन्न औद्योगिक क्षेत्रांकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सप्टेंबर महिन्यासाठीची स्लीपर आणि एसी-३ ची तिकीटे बूक झालेली आहेत.देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आलेली आहे. नंतरच्या काळात रेल्वेने काही श्रमिक ट्रेन तसेच २३० विशेष गाड्या आणि ३० राजधानी गाड्या चालवल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत