शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 07:04 IST

सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जातत्यासाठी राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जातया राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापैकी हटवण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. मात्र प्रवासाच्या साधनांवर सध्यातरी मर्यादा असल्याने प्रवास आणि दळणवळण अद्यापतरी अडचणीचे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १०० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी या रेल्वे गाड्या जिथून सो़डल्या जातील आणि जिथे पोहोचतील अशा राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे. या राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती प्रवक्त्याने दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील.रेल्वेकडून सध्या देशभरात २३० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यामध्ये कामगारांची मागणी वाढत आहेत. त्यामुळे अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत. सद्यस्थितीत सप्टेंबर महिन्यासाठीची रेल्वेची सर्व तिकिटे बूक झालेली आहेत. बिहार, बंगाल, ओदिशा, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि अन्न औद्योगिक क्षेत्रांकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सप्टेंबर महिन्यासाठीची स्लीपर आणि एसी-३ ची तिकीटे बूक झालेली आहेत.देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आलेली आहे. नंतरच्या काळात रेल्वेने काही श्रमिक ट्रेन तसेच २३० विशेष गाड्या आणि ३० राजधानी गाड्या चालवल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत