शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus: 20 एप्रिलनंतर 'या' ठिकाणचा लॉकडाऊन शिथील होईल, पण...; पंतप्रधानांचे महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 10:58 IST

स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.

ठळक मुद्देमोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुरू असलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, असंसुद्धा मोदींनी सांगितलं आहे. मोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.20 एप्रिलपर्यंत कोरोना लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. जी ठिकाणे सुरक्षित असतील तिथे थोडी शिथिलता मिळेल. उद्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, ज्या क्षेत्रांनी आपलं हॉटस्पॉट वाढू दिलेलं नाही, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. जेव्हा देशात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणाऱ्या लोकांची टेस्टिंग सुरू केली होती. जगातल्या बड्या बड्या राष्ट्रांची स्थिती पाहिल्यास भारताची स्थिती खूप नियंत्रणात आहे, असंसुद्धा मोदींनी स्पष्ट केलं आहे.लॉकडाऊनच्या या काळात देशातील लोक ज्याप्रकारे नियमांचं पालन करत आहेत, ज्याप्रकारे घरातच राहून सण-उत्सव साजरा करत आहेत, ते प्रशंसनीय असल्याचंही मोदींनी अधोरेखित केलं आहे. कोरोना या साथीच्या लढाईविरोधात, भारत नेटाने लढत आहे. तुमच्या धिरामुळे, त्यागामुळे आतापर्यंत कोरोनामुळे होणारं नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आल्याचा उल्लेखही मोदींनी केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनविताना, आम्ही गरीब आणि दैनंदिन वेतन कामगारांचे हित लक्षात घेतलेले आहे. रब्बी पिकांच्या काढणीचे कामही सुरू आहे. शेतकर्‍यांनी कमीत कमी समस्यांना सामोरे जावे यासाठी केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करीत आहेत, असंसुद्धा मोदींनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस