शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

coronavirus: आठ देशांतून हजारो भारतीय परतले, १२ देशांतील १५ हजारांहून अधिक भारतीयांना १३ मेपर्यंत ६४ विशेष विमानांनी आणणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:01 IST

पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परदेशांत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानांनी व नौदलाच्या युद्धनौकांनी मायदेशी परत आणण्याच्या अनुक्रमे ‘वंदे भारत’व ‘सागरसेतू’ या मोहिमांतर्गत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून रविवारच्या पहाटेपर्यंत आठ देशांतून हजारो नागरिकांना देशातील विविध शहरांमध्ये सुखरूपपणे परत आणण्यात आले.याच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली. या विमानांनी ढाक्याहून दिल्लीला, कुवेतहून हैदराबादला, मस्कतहून कोचीनला, शारजाहून लखनऊला, कुवेतहून कोचीनला, कुआलालंपूरहून त्रिचीला, लंडनहून मुंबईला, तर दोहाहून कोचीनला अडकलेल्या भारतीयांना आणून सोडले.‘वंदे भारत’ मोहिमेत एकूण १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना १३ मेपर्यंत एकूण ६४ विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात येणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात कझागस्तान, उझबेगिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन व थायलंड येथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.सुरतमध्ये स्थलांतरितमजूर पुन्हा रस्त्यावरसुरत : राज्य सरकारकडून घरी परत जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी सुरत जिल्ह्यात हिजिरा औद्योगिकपट्ट्यातील मोरा गावी रस्त्यावर येऊन निदर्शने व दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी ३० दंगलखोर कामगारांना ताब्यात घेतले. सुरत जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेश व ओडिशाहून आलेले हजारो स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. उद्योजकांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार घरी जाऊ इच्छिणाऱ्या या कामगारांना मुद्दाम डांबून ठेवत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी केला.२२५ बिहारी कामगारांनातेलंगणने परत आणलेहैदराबाद : होळीसाठी घरी गेलेल्या; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे तेथेच अडकून पडलेल्या बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील २२५ कामगारांना तेलंगण सरकारने विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडीची सोय करून राज्यात परत आणले. या सर्व कामगारांचे प्रवासाचे भाडे तेलंगण सरकारने भरले. बिहारहून आलेल्या रेल्वेतून हे कामगार लिंगमपल्ली स्टेशनवर उतरले तेव्हा नागरी पुरवठामंत्री गंगुला कमलाकर यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. हे कामगार गेली अनेक वर्षे तेलंगणमधील भात सडण्याच्या गिरण्यांमध्ये काम करणारे आहेत. अशाच प्रकारे इतर राज्यांमधूनही कामगारांना तेलंगणमध्ये सन्मानाने परत आणले जाईल, असे तेलंगण राष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत