शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

coronavirus: आठ देशांतून हजारो भारतीय परतले, १२ देशांतील १५ हजारांहून अधिक भारतीयांना १३ मेपर्यंत ६४ विशेष विमानांनी आणणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:01 IST

पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परदेशांत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानांनी व नौदलाच्या युद्धनौकांनी मायदेशी परत आणण्याच्या अनुक्रमे ‘वंदे भारत’व ‘सागरसेतू’ या मोहिमांतर्गत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून रविवारच्या पहाटेपर्यंत आठ देशांतून हजारो नागरिकांना देशातील विविध शहरांमध्ये सुखरूपपणे परत आणण्यात आले.याच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली. या विमानांनी ढाक्याहून दिल्लीला, कुवेतहून हैदराबादला, मस्कतहून कोचीनला, शारजाहून लखनऊला, कुवेतहून कोचीनला, कुआलालंपूरहून त्रिचीला, लंडनहून मुंबईला, तर दोहाहून कोचीनला अडकलेल्या भारतीयांना आणून सोडले.‘वंदे भारत’ मोहिमेत एकूण १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना १३ मेपर्यंत एकूण ६४ विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात येणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात कझागस्तान, उझबेगिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन व थायलंड येथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.सुरतमध्ये स्थलांतरितमजूर पुन्हा रस्त्यावरसुरत : राज्य सरकारकडून घरी परत जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी सुरत जिल्ह्यात हिजिरा औद्योगिकपट्ट्यातील मोरा गावी रस्त्यावर येऊन निदर्शने व दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी ३० दंगलखोर कामगारांना ताब्यात घेतले. सुरत जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेश व ओडिशाहून आलेले हजारो स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. उद्योजकांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार घरी जाऊ इच्छिणाऱ्या या कामगारांना मुद्दाम डांबून ठेवत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी केला.२२५ बिहारी कामगारांनातेलंगणने परत आणलेहैदराबाद : होळीसाठी घरी गेलेल्या; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे तेथेच अडकून पडलेल्या बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील २२५ कामगारांना तेलंगण सरकारने विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडीची सोय करून राज्यात परत आणले. या सर्व कामगारांचे प्रवासाचे भाडे तेलंगण सरकारने भरले. बिहारहून आलेल्या रेल्वेतून हे कामगार लिंगमपल्ली स्टेशनवर उतरले तेव्हा नागरी पुरवठामंत्री गंगुला कमलाकर यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. हे कामगार गेली अनेक वर्षे तेलंगणमधील भात सडण्याच्या गिरण्यांमध्ये काम करणारे आहेत. अशाच प्रकारे इतर राज्यांमधूनही कामगारांना तेलंगणमध्ये सन्मानाने परत आणले जाईल, असे तेलंगण राष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत