शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 19:21 IST

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे.

नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या मुद्द्यावरून लोकांना गंभीर इशारा दिला आहे. (Third Wave of Corona virus )

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे प्रकृतीपेक्षा आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. बाजार आणि पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी आणि मास्कचा वापर होत नसल्याचा उल्लेख करून आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लोक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बोलताना त्याबाबत हवामानाच्या अंदाजाप्रमाणे विचार करत आहेत. मात्र याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही बाब पहिल्या पावसानंतर फिरण्यासारखी नाही तर ही मनुष्य आणि विषाणूमध्ये चालणारी लढाई आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे निसर्गापेक्षा आमच्या वर्तनावर अवलंबून असेल, असेही आरोग्य मंत्रायाने सांगितले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जगामध्ये कोरोनाची तिसरी लाट दिसत आहे. ही लाट आपल्या देशात येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३१ हजार ४४३ रुग्ण सापडले आहेत. आताही देशामध्ये ७३ असे जिल्हे आहेत जिथे दररोज १०० हून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमागे काही राज्ये देत असलेली जुनी माहिती हे महत्त्वाचे कारण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोनामुळे २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील १४३१ जुन्या मृत्यूंचा समावेश आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रानेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे एकूण मृतांमध्ये वाढ दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्ये ही कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवत होते. ते लपवलेले आकडे आता मुख्य आकडेवारीमध्ये समाविष्ट केले जात आहेत. महाराष्ट्रातूनही अशाप्रकारे जुने आकडे एकत्रित करून पाठवले जात आहेत. हेच धोरण बिहारनेही अवलंबले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत