शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 19:21 IST

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे.

नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या मुद्द्यावरून लोकांना गंभीर इशारा दिला आहे. (Third Wave of Corona virus )

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे प्रकृतीपेक्षा आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. बाजार आणि पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी आणि मास्कचा वापर होत नसल्याचा उल्लेख करून आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लोक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बोलताना त्याबाबत हवामानाच्या अंदाजाप्रमाणे विचार करत आहेत. मात्र याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही बाब पहिल्या पावसानंतर फिरण्यासारखी नाही तर ही मनुष्य आणि विषाणूमध्ये चालणारी लढाई आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे निसर्गापेक्षा आमच्या वर्तनावर अवलंबून असेल, असेही आरोग्य मंत्रायाने सांगितले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जगामध्ये कोरोनाची तिसरी लाट दिसत आहे. ही लाट आपल्या देशात येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३१ हजार ४४३ रुग्ण सापडले आहेत. आताही देशामध्ये ७३ असे जिल्हे आहेत जिथे दररोज १०० हून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमागे काही राज्ये देत असलेली जुनी माहिती हे महत्त्वाचे कारण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोनामुळे २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील १४३१ जुन्या मृत्यूंचा समावेश आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रानेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे एकूण मृतांमध्ये वाढ दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्ये ही कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवत होते. ते लपवलेले आकडे आता मुख्य आकडेवारीमध्ये समाविष्ट केले जात आहेत. महाराष्ट्रातूनही अशाप्रकारे जुने आकडे एकत्रित करून पाठवले जात आहेत. हेच धोरण बिहारनेही अवलंबले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत