शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 19:21 IST

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे.

नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या मुद्द्यावरून लोकांना गंभीर इशारा दिला आहे. (Third Wave of Corona virus )

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे प्रकृतीपेक्षा आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. बाजार आणि पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी आणि मास्कचा वापर होत नसल्याचा उल्लेख करून आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लोक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बोलताना त्याबाबत हवामानाच्या अंदाजाप्रमाणे विचार करत आहेत. मात्र याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही बाब पहिल्या पावसानंतर फिरण्यासारखी नाही तर ही मनुष्य आणि विषाणूमध्ये चालणारी लढाई आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे निसर्गापेक्षा आमच्या वर्तनावर अवलंबून असेल, असेही आरोग्य मंत्रायाने सांगितले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जगामध्ये कोरोनाची तिसरी लाट दिसत आहे. ही लाट आपल्या देशात येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३१ हजार ४४३ रुग्ण सापडले आहेत. आताही देशामध्ये ७३ असे जिल्हे आहेत जिथे दररोज १०० हून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमागे काही राज्ये देत असलेली जुनी माहिती हे महत्त्वाचे कारण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोनामुळे २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील १४३१ जुन्या मृत्यूंचा समावेश आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रानेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे एकूण मृतांमध्ये वाढ दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्ये ही कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवत होते. ते लपवलेले आकडे आता मुख्य आकडेवारीमध्ये समाविष्ट केले जात आहेत. महाराष्ट्रातूनही अशाप्रकारे जुने आकडे एकत्रित करून पाठवले जात आहेत. हेच धोरण बिहारनेही अवलंबले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत