शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 18:58 IST

Coronavirus in India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर आता ही लाट कधीपर्यंत सुरू राहील, असा प्रश्न आता विचारला जात आहे

नवी दिल्ली - भारतात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता जवळपास ओसरू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू झालेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या अखेरीस चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली होती. मात्र ९ मेनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होऊ लागली असून, देश कोरोनाविरोधात योग्य पद्धतीने लढत असल्याचे ते संकेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर आता ही लाट कधीपर्यंत सुरू राहील, असा प्रश्न आता विचारला जात आहे,  या प्रश्नाचे उत्तर आता सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिले आहे. (the second wave of coronavirus will end in the next two weeks in India)

जर सारे काही व्यवस्थित घडले तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली. 

मात्र जुगल किशोर यांनी सांगितले की, भारतामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ओसरणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर  लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल.

डॉ. जुगल किशोर यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या. सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल. तसतसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोपही कमी होईल. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी यासंबंधीची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत पुढचे दहा दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरतात. केवळ रुग्णांसाठीच नव्हेतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसाठीही यादरम्यान काही त्रास न जाणवल्यास ती चांगली बाब आहे. मात्र त्रास जाणवल्यास त्याला त्वरित आयसोलेट केले पाहिजे. 

सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होणे हे रुग्णांचे कॉन्टॅक्ट कमी होत असल्याचा पुरावा आहेत. ही बाब कठोर नियमांमुळे शक्य झाली आहे. देशातील बहुतांश लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यामधील काही जण हे औषधांच्या माध्यमातून तर काहीजण प्रबळ प्रतिकार शक्ती मुळे कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच या लोकांच्या संपर्कात असलेल्यांपैकी मोजक्याच लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतHealthआरोग्य