शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान परराज्यांतील मजुरांची स्वगृही परतण्याची धडपड; सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:38 IST

कोरोनामुळे भारतातही नवं संकट उभं राहिलं असून, हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हालाला पारावार उरलेला नाही.

ठळक मुद्देपरराज्यातून आलेले हे मजूर लॉकडाऊनदरम्यान स्वतःच्या गावी परतण्यासाठी पलायन करताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच पाहणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचं सांगण्यात आलं असून, पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारनं देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतातही नवं संकट उभं राहिलं असून, हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हालाला पारावार उरलेला नाही. त्यामुळे परराज्यातून आलेले हे मजूर लॉकडाऊनदरम्यान स्वतःच्या गावी परतण्यासाठी पलायन करताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना केंद्र सरकारनं प्रवासी मजुरांसाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं आहे.यासंदर्भात लवकरच पाहणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचं सांगण्यात आलं असून, पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, भारतातील संघटना आणि सर्व राज्य सरकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. यासंदर्भात लवकरच आपण प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यावर कोर्टाने म्हटले की, सरकार स्थलांतरित मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी आधीपासूनच चांगली कामे करीत आहेत.अशा परिस्थितीत कोर्टाला यात हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही. स्थिती अहवालाची प्रतीक्षा करत असून, त्यानंतरच निर्णय देऊ, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्ते अ‍ॅड. अ‍लख आलोक श्रीवास्तव यांना सांगितले की, 'आम्ही सर्व गोष्टी हाताळू शकतो, परंतु केंद्र सरकार जे काही प्रयत्न करत आहे, त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आधी सरकारकडून दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र पाहायचे  आहे, त्यानंतर बुधवारी सुनावणी होऊ शकेल, असंही सरन्यायाधीश शरद बोबडेंनी स्पष्ट केलं.      याचिका कोणी दाखल केली?कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदमुळे बेरोजगार आणि बेघर लोक आता आपल्या गावी व खेड्याकडे जाण्यास निघाले आहेत. अशा प्रकरणात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शेकडो किलोमीटर चालत आहेत. त्यांच्याकडे जगण्याची सुविधा नाही किंवा घरी पोहोचण्याचे साधन नाही, या लोकांना भयंकर अडचणी येत आहेत. या लोकांना निवारा गृहात ठेवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारांना आदेश द्यावेत, असा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला आहे.                   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय