शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:20 IST

भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे.भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याचे नेमके कारण सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

याबाबत अधिक स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यात देशात केवळ एका लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत होती. मात्र आज ३८५ सरकारी आणि १८ खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत आहे.  

भारतात आतापर्यंत ३ हजार १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात १ लाख ०१ हजार १३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी देशात कोरोनाच्या १ लाख ०८ हजार संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, जगभरात मंगळवारपर्यंत ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दर एक लाख लोकांमागे ४.१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय