शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:20 IST

भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे.भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याचे नेमके कारण सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

याबाबत अधिक स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यात देशात केवळ एका लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत होती. मात्र आज ३८५ सरकारी आणि १८ खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत आहे.  

भारतात आतापर्यंत ३ हजार १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात १ लाख ०१ हजार १३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी देशात कोरोनाच्या १ लाख ०८ हजार संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, जगभरात मंगळवारपर्यंत ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दर एक लाख लोकांमागे ४.१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय