शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

coronavirus: म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:20 IST

भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे.भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याचे नेमके कारण सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.

याबाबत अधिक स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यात देशात केवळ एका लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत होती. मात्र आज ३८५ सरकारी आणि १८ खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत आहे.  

भारतात आतापर्यंत ३ हजार १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात १ लाख ०१ हजार १३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी देशात कोरोनाच्या १ लाख ०८ हजार संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, जगभरात मंगळवारपर्यंत ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दर एक लाख लोकांमागे ४.१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय