शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Coronavirus: भारतातील दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 10:56 IST

Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.

नवी दिल्ली - गेली दोन वर्षे देशात धुमाकूळ घालत असलेला कोरोना आता भारतातून संपल्यात जमा असल्याचे चित्र गेल्या काही आठवड्यांमधील आकडेवारीतून दिसत आहे. साप्ताहिक रुग्णसंख्येच्या आकडेवारीतूनही देशातील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. मात्र देशातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दोन्ही राज्यांत ज्या प्रकारे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यावरून चौथ्या लाटेबाबतची भीती पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा दीडशेच्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीमध्ये २६ टक्के तर हरियाणामध्ये ५० टक्के एवढी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.

दिल्लीमध्ये रविवारी १४१ रुग्ण नोंदवले गेले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आकडेवारीचा विचार केल्यास दिल्लीमध्ये आठवडाभरात २६ टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. तिसरी लाट ओसरून संसर्गात घट झाल्यानंतर गेल्या सात दिवसांत ७५१ वरून ९४३ रुग्णांची नोंद झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १ टक्क्याच्या वर नोंदवला जात आहे.

दिल्लीसारखीच परिस्थिती हरियाणामध्येही आहे. येथेही कोरोनाच्या रुग्णसंसख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली शेजारील राज्य असलेल्या हरियाणामध्येही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. हरियाणामध्ये गेल्या आठवड्यातील ३४४ रुग्णांवरून तब्बल ५० टक्क्यांची वाढ होत या आठवड्यात ५१४ रुग्णांची नोंद झाली.

दिल्लीमध्ये १३ जानेवारी रोजी २८ हजार ८६७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत घट झाली. दिल्लीमध्ये १४ जानेवारी रोजी संसर्गाचा दर हा ३०.६ टक्के होता. रविवारी दिल्लीत ६११४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली त्यामधील १.३४ पॉझिटिव्ह आले. दरम्यान, भारतामध्ये एका दिवसात कोरोनाचे १ हजार ५४ रुग्ण सापडल्यानंतर देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही ४ कोटी ३० लाख, ३५ हजार २७१ एवढी झाली आहे. तर २९ जणांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा हा ५ लाख २१ हजार ६८५ वर पोहोचला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHaryanaहरयाणाIndiaभारत