शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Coronavirus: भारतातील दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 10:56 IST

Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.

नवी दिल्ली - गेली दोन वर्षे देशात धुमाकूळ घालत असलेला कोरोना आता भारतातून संपल्यात जमा असल्याचे चित्र गेल्या काही आठवड्यांमधील आकडेवारीतून दिसत आहे. साप्ताहिक रुग्णसंख्येच्या आकडेवारीतूनही देशातील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. मात्र देशातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दोन्ही राज्यांत ज्या प्रकारे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यावरून चौथ्या लाटेबाबतची भीती पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा दीडशेच्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीमध्ये २६ टक्के तर हरियाणामध्ये ५० टक्के एवढी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.

दिल्लीमध्ये रविवारी १४१ रुग्ण नोंदवले गेले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आकडेवारीचा विचार केल्यास दिल्लीमध्ये आठवडाभरात २६ टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. तिसरी लाट ओसरून संसर्गात घट झाल्यानंतर गेल्या सात दिवसांत ७५१ वरून ९४३ रुग्णांची नोंद झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १ टक्क्याच्या वर नोंदवला जात आहे.

दिल्लीसारखीच परिस्थिती हरियाणामध्येही आहे. येथेही कोरोनाच्या रुग्णसंसख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली शेजारील राज्य असलेल्या हरियाणामध्येही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. हरियाणामध्ये गेल्या आठवड्यातील ३४४ रुग्णांवरून तब्बल ५० टक्क्यांची वाढ होत या आठवड्यात ५१४ रुग्णांची नोंद झाली.

दिल्लीमध्ये १३ जानेवारी रोजी २८ हजार ८६७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत घट झाली. दिल्लीमध्ये १४ जानेवारी रोजी संसर्गाचा दर हा ३०.६ टक्के होता. रविवारी दिल्लीत ६११४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली त्यामधील १.३४ पॉझिटिव्ह आले. दरम्यान, भारतामध्ये एका दिवसात कोरोनाचे १ हजार ५४ रुग्ण सापडल्यानंतर देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही ४ कोटी ३० लाख, ३५ हजार २७१ एवढी झाली आहे. तर २९ जणांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा हा ५ लाख २१ हजार ६८५ वर पोहोचला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHaryanaहरयाणाIndiaभारत