शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या आता पूर्ण क्षमतेने चालणार, अधिक स्थलांतरित मजुरांची सोय होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:28 IST

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले. या कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी अशी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी ज्या राज्यासाठी सोडली असेल त्या राज्यात अंतिम गंतव्य स्थानाखेरीज आणखी तीन ठिकाणी थांबविण्याची सोयही रेल्वेने केली आहे.या विशेष रेल्वेगाड्या प्रत्येकी २४ डब्यांच्या आहेत. प्रत्येक डब्यात ७२ बर्थ असतात. म्हणजे प्रत्येक गाडीची प्रवासीक्षमता सुमारे १,७२८ एवढी असते. परंतु आधी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्यासाठी सर्व मधील बर्थ रिकामे ठेवले जात होते. त्यामुळे एका गाडीने जास्तीत जास्त १,२०० प्रवासी प्रवास करू शकत होते. मात्र आता मधले बर्थ रिकामे ठेवण्यात येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक विशेष गाडीने आता सुमारे ५०० अधिक असे एकूण १,७०० प्रवासी जाऊ शकतील.आधी या गाड्या ‘पॉइंट टू पॉइंट’ पद्धतीने चालविल्या जायच्या. म्हणजे सुटली की मध्ये कुठेही न थांबता थेट गंतव्यस्थानी जायची. परंतु तेथून पुन्हा आपापल्या जिल्ह्यांत पोहोचण्यासाठी या मजुरांना अडचणी यायच्या. हे लक्षात घेऊन आता या गाड्या संबंधित राज्यात एकूण चार ठिकाणी थांबतील.आतापर्यंत पाच लाख मजुरांना लाभराज्यांच्या मागणीनुसार दररोज अशा ३०० विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविण्याची रेल्वेने तयारी ठेवली आहे. अशा प्रकारे घरी परतू इच्छिणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना, पुढील आठ-दहा दिवसांत, त्यांच्या राज्यात परतणे शक्य होईल, अशी रेल्वेची अपेक्षा आहे. १ मे रोजी अशा विशेष गाड्या सुरू केल्यापासून सोमवारपर्यंत ४६८ गाड्यांमधून पाच लाख स्थलांतरित मजूर आपापल्या घरी परत गेले आहेत.पायी जाणाऱ्यांना थांबवाविशेष रेल्वेगाड्यांखेरीज अनेक राज्यांनी अन्य राज्यांमधून आपापल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष बसचीही सोय केली आहे. तरी अशा स्थलांतरित मजुरांचे तांडे महामार्गांवरून व रेल्वे मार्गातून चालत जाताना दिसतात. त्यातून अपघात होऊन गेल्या आठवडाभरात ५०हूनअधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. कॅबिनेट सचिवांनी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या घेतलेल्या व्हिडिओ बैठकीत याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली गेली. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सोमवारी पत्र पाठवून, त्यांनी आपल्या राज्यातून जास्तीत जास्त श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले. तसेच रस्त्याने किंवा रेल्वेमागार्तून चालत जाणाºयांना थांबवून, रेल्वे किंवा बसने त्यांची घरी परतण्याची सोय होईपर्यंत, त्यांना निवारा शिबिरांमध्ये ठेवून तेथे त्यांच्या राहण्याच्या तसेच जेवणाची सोय करावी, असेही राज्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वे