शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

coronavirus: श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या आता पूर्ण क्षमतेने चालणार, अधिक स्थलांतरित मजुरांची सोय होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:28 IST

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले. या कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी अशी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी ज्या राज्यासाठी सोडली असेल त्या राज्यात अंतिम गंतव्य स्थानाखेरीज आणखी तीन ठिकाणी थांबविण्याची सोयही रेल्वेने केली आहे.या विशेष रेल्वेगाड्या प्रत्येकी २४ डब्यांच्या आहेत. प्रत्येक डब्यात ७२ बर्थ असतात. म्हणजे प्रत्येक गाडीची प्रवासीक्षमता सुमारे १,७२८ एवढी असते. परंतु आधी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्यासाठी सर्व मधील बर्थ रिकामे ठेवले जात होते. त्यामुळे एका गाडीने जास्तीत जास्त १,२०० प्रवासी प्रवास करू शकत होते. मात्र आता मधले बर्थ रिकामे ठेवण्यात येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक विशेष गाडीने आता सुमारे ५०० अधिक असे एकूण १,७०० प्रवासी जाऊ शकतील.आधी या गाड्या ‘पॉइंट टू पॉइंट’ पद्धतीने चालविल्या जायच्या. म्हणजे सुटली की मध्ये कुठेही न थांबता थेट गंतव्यस्थानी जायची. परंतु तेथून पुन्हा आपापल्या जिल्ह्यांत पोहोचण्यासाठी या मजुरांना अडचणी यायच्या. हे लक्षात घेऊन आता या गाड्या संबंधित राज्यात एकूण चार ठिकाणी थांबतील.आतापर्यंत पाच लाख मजुरांना लाभराज्यांच्या मागणीनुसार दररोज अशा ३०० विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविण्याची रेल्वेने तयारी ठेवली आहे. अशा प्रकारे घरी परतू इच्छिणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना, पुढील आठ-दहा दिवसांत, त्यांच्या राज्यात परतणे शक्य होईल, अशी रेल्वेची अपेक्षा आहे. १ मे रोजी अशा विशेष गाड्या सुरू केल्यापासून सोमवारपर्यंत ४६८ गाड्यांमधून पाच लाख स्थलांतरित मजूर आपापल्या घरी परत गेले आहेत.पायी जाणाऱ्यांना थांबवाविशेष रेल्वेगाड्यांखेरीज अनेक राज्यांनी अन्य राज्यांमधून आपापल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष बसचीही सोय केली आहे. तरी अशा स्थलांतरित मजुरांचे तांडे महामार्गांवरून व रेल्वे मार्गातून चालत जाताना दिसतात. त्यातून अपघात होऊन गेल्या आठवडाभरात ५०हूनअधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. कॅबिनेट सचिवांनी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या घेतलेल्या व्हिडिओ बैठकीत याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली गेली. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सोमवारी पत्र पाठवून, त्यांनी आपल्या राज्यातून जास्तीत जास्त श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले. तसेच रस्त्याने किंवा रेल्वेमागार्तून चालत जाणाºयांना थांबवून, रेल्वे किंवा बसने त्यांची घरी परतण्याची सोय होईपर्यंत, त्यांना निवारा शिबिरांमध्ये ठेवून तेथे त्यांच्या राहण्याच्या तसेच जेवणाची सोय करावी, असेही राज्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वे