शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

CoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते? मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 20:07 IST

Coronavirus: निजामुद्दीन मरकज प्रकरणावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मुंबई: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिल्लीत गेल्या महिन्यात तबलिगी समाजाकडून मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानं खळबळ माजली आहे. तबलिगी समाजाचे शेकडो जण विविध राज्यांत परतल्यानं देशातल्या राज्य सरकारांचे धाबे दणाणले आहेत. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतले पोलीस मोदी, शहांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांना वेळीच आदेश का देण्यात आले नाहीत, असा प्रश्नदेखील राऊत यांनी विचारला.देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे देशद्रोह असल्याचं राऊत म्हणाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. देशात संवेदनशील परिस्थिती असताना अशा प्रकारची कृती म्हणजे मस्तवालपणा आणि मूर्खपणा आहे. फरहान अख्तर, जावेद अख्तर, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्यासारख्यांनी यावर टीका केली आहे. मात्र त्या समाजाचे नेते यावर मूग गिळून गप्प आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे दोन सरकारं काम करतात. १८ मार्चला निझामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी झाली. कोरोनाचा धोका वाढत असताना इतक्या झुंडी येत असल्याचं दोन्ही सरकारांच्या लक्षात आलं नाही का? की त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीतील पोलीस यंत्रणा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियंत्रणाखाली येते. सध्या चार लोक दिसताच दंडुके मारणारे पोलीस त्यावेळी इतक्या झुंडी येत असताना काय करत होते?, असा सवाल विचारत त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याची परिस्थिती पाहता केंद्रानं निर्घृणपणे आणि अमानुषपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंदेखील राऊत यांनी म्हटलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाSanjay Rautसंजय राऊतAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल