शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

CoronaVirus: कोरोनाचा कहर कायम; दुसरी लाट अधिक आक्रमक, ३०० टक्के तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 11:14 IST

CoronaVirus: गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देभारतात कोरोनाचा कहर कायमगेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत जात असून, देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यानंतर यावरून राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहेत. (coronavirus second wave more aggressive 300 percent faster)

काही संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या मते देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक आक्रमक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग ३०० टक्के अधिक तीव्र असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी म्हणजेच सन २०२० मधील मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दररोज ६० हजार रुग्ण आढळून येत होते. 

coronavirus: अग्रलेख - लॉकडाऊनचे डोहाळे थांबवा!

गेल्या ३० दिवसांत तीन लाख कोरोना रुग्ण

गतवर्षीच्या जुलैप्रमाणेच आताच्या घडीला प्रतिदिन रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढत राहिली, तर यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही २०० टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या ०१,२०,३९,६४४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात ०१,६१,८४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस