शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

CoronaVirus: कोरोनाचा कहर कायम; दुसरी लाट अधिक आक्रमक, ३०० टक्के तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 11:14 IST

CoronaVirus: गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देभारतात कोरोनाचा कहर कायमगेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत जात असून, देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यानंतर यावरून राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहेत. (coronavirus second wave more aggressive 300 percent faster)

काही संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या मते देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक आक्रमक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग ३०० टक्के अधिक तीव्र असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी म्हणजेच सन २०२० मधील मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दररोज ६० हजार रुग्ण आढळून येत होते. 

coronavirus: अग्रलेख - लॉकडाऊनचे डोहाळे थांबवा!

गेल्या ३० दिवसांत तीन लाख कोरोना रुग्ण

गतवर्षीच्या जुलैप्रमाणेच आताच्या घडीला प्रतिदिन रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढत राहिली, तर यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही २०० टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या ०१,२०,३९,६४४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात ०१,६१,८४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस