शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सध्याच्या कोरोना व्हायरस स्थितीबाबत WHO ने दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 16:48 IST

डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या. 

भारतात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 1190 लोकांना लागण झाली आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत 32 लोकांचा जीव गेला आहे. पण भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाणारे लोक आहेत. हे लोक भारतात कोरोनाचं संक्रमण वाढण्याचं मोठं कारण ठरू शकतात. जर हा व्हायरस भारतातील गावांमध्ये पोहोचला तर देशाची हालत खराब होईल असा इशारा देण्यात आलाय.

भारतातील गावांबाबतचा हा इशारा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी बिजनेस टुडेशी बोलताना दिला. डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या. 

(Image Credit : indiatoday.in)

डॉ. सौम्या यांनी सांगितले की, भारतासमोर सर्वात मोठी समस्या ही आहे की, भारतात सोशल डिस्टंसिंग होत नाही. एकाच घरात अनेक लोक राहतात आणि एकाच बाथरूमचा वापर करतात. याने कोणत्याही आजारांचं संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे सर्वात महत्वाचं हे आहे की, लोकांनी स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावं. व्यक्तिगत स्वच्छतेसोबतच सोशल डिस्टंसिंगचीही काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणांवर थुंकू नये. याने या व्हायरसा रोखण्यात मोठी मदत होईल.

(Image Credit : aljazeera.com)

डॉ. सौम्या यांनी चिंता व्यक्त केली की, जे लोक प्रवासी आहेत. मजूर आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी आणि गावाकडे निघाले आहेत. यांच्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका अधिक वाढतो. जर हे लोक गावांमध्ये पोहोचले आणि तिकडे कुणाला संक्रमण झालं तर समस्या अधिक वाढेल.

त्या म्हणाल्या की, जर संक्रमण गावांपर्यंत पोहोचला तर सरकारला टेस्टची संख्या वाढवावी लागेल. ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात. कारण हा व्हायरस लिंग, वय, धर्म, परिसर, देश, श्रीमंत, गरिब असा फरक करत नाही. याचं एकच काम आहे लोकांना मारणं.

डॉ. सौम्या म्हणाल्या की, भारत असो वा युरोप इतरही देश सध्या व्हायरससमोर झुकलेले आहेत. प्रत्येक देशात एक वेगळी समस्या आहे. कोणत्याही देशाला तीन पद्धतीने काम करावं लागेल. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉन्ग टर्मच्या तयारीसाठी.

लॉकडाउन हटवल्यावर काय होईल यावर डॉ. सौम्या म्हणाल्या की, लॉकडाउननंतरही आपणं सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होता नये. समारंभ, सभा बंद असल्या पाहिजे.आता देशातील ग्रामीण भागांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून हे कळावं की, कोणती व्यक्ती कोणत्या शहरातून आली आणि ती व्यक्ती संक्रमित आहे की नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतHealthआरोग्य