शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सध्याच्या कोरोना व्हायरस स्थितीबाबत WHO ने दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 16:48 IST

डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या. 

भारतात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 1190 लोकांना लागण झाली आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत 32 लोकांचा जीव गेला आहे. पण भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाणारे लोक आहेत. हे लोक भारतात कोरोनाचं संक्रमण वाढण्याचं मोठं कारण ठरू शकतात. जर हा व्हायरस भारतातील गावांमध्ये पोहोचला तर देशाची हालत खराब होईल असा इशारा देण्यात आलाय.

भारतातील गावांबाबतचा हा इशारा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी बिजनेस टुडेशी बोलताना दिला. डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या. 

(Image Credit : indiatoday.in)

डॉ. सौम्या यांनी सांगितले की, भारतासमोर सर्वात मोठी समस्या ही आहे की, भारतात सोशल डिस्टंसिंग होत नाही. एकाच घरात अनेक लोक राहतात आणि एकाच बाथरूमचा वापर करतात. याने कोणत्याही आजारांचं संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे सर्वात महत्वाचं हे आहे की, लोकांनी स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावं. व्यक्तिगत स्वच्छतेसोबतच सोशल डिस्टंसिंगचीही काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणांवर थुंकू नये. याने या व्हायरसा रोखण्यात मोठी मदत होईल.

(Image Credit : aljazeera.com)

डॉ. सौम्या यांनी चिंता व्यक्त केली की, जे लोक प्रवासी आहेत. मजूर आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी आणि गावाकडे निघाले आहेत. यांच्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका अधिक वाढतो. जर हे लोक गावांमध्ये पोहोचले आणि तिकडे कुणाला संक्रमण झालं तर समस्या अधिक वाढेल.

त्या म्हणाल्या की, जर संक्रमण गावांपर्यंत पोहोचला तर सरकारला टेस्टची संख्या वाढवावी लागेल. ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात. कारण हा व्हायरस लिंग, वय, धर्म, परिसर, देश, श्रीमंत, गरिब असा फरक करत नाही. याचं एकच काम आहे लोकांना मारणं.

डॉ. सौम्या म्हणाल्या की, भारत असो वा युरोप इतरही देश सध्या व्हायरससमोर झुकलेले आहेत. प्रत्येक देशात एक वेगळी समस्या आहे. कोणत्याही देशाला तीन पद्धतीने काम करावं लागेल. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉन्ग टर्मच्या तयारीसाठी.

लॉकडाउन हटवल्यावर काय होईल यावर डॉ. सौम्या म्हणाल्या की, लॉकडाउननंतरही आपणं सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होता नये. समारंभ, सभा बंद असल्या पाहिजे.आता देशातील ग्रामीण भागांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून हे कळावं की, कोणती व्यक्ती कोणत्या शहरातून आली आणि ती व्यक्ती संक्रमित आहे की नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतHealthआरोग्य