शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 08:45 IST

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेलेगेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे

नवी दिल्ली – संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. मागील काही दिवसात वाऱ्याच्या वेगाने कोरोना पसरत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ होती, १४ मार्च पर्यंत हा आकडा वाढून १०० वर पोहचला. २४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची सख्या ५०० वर येऊन पोहचली. तर २९ मार्चनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली तर गेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा अंदाज लावला तर अवघ्या ४ दिवसांत १ हजार रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस किती जलदगतीने भारतात पसरतोय हे दिसून येते.

भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे. निजामुद्दीन मरकजचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. मार्च महिन्यात मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देशातील १९ राज्य आणि परदेशातील १६ देशातील जवळपास ८ ते ९ हजार लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.

कार्यक्रमानंतर लॉकडाऊनपर्यंत मरकज येथे अडीच हजार लोक राहिले तर बाकीचे लोक आपापल्या राज्यात निघून गेले. यातील काही लोकांमध्ये कोरोना संक्रमण आढळलं. तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. आता हे लोक कोणकोणत्या राज्यात गेले, कोणाच्या संपर्कात आलेत या सर्वाचा शोध घेणं मोठं आव्हानात्मक आहे. राज्यात युद्धस्तरावर या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेणं सुरु आहे. या लोकांशी संपर्कात आलेल्या आतापर्यंत ९ हजार लोकांना क्वारंटाईन केले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. फक्त दिल्लीत कोरोना व्हायरसचे २९३ रुग्ण आढळून आलेत त्यातील १८२ रुग्ण मरकजशी जोडले गेले होते. राजधानी दिल्लीत मरकज येथे गेलेल्या दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर देशात मरकजशी जोडलेल्या १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या