शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 08:45 IST

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेलेगेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे

नवी दिल्ली – संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. मागील काही दिवसात वाऱ्याच्या वेगाने कोरोना पसरत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ होती, १४ मार्च पर्यंत हा आकडा वाढून १०० वर पोहचला. २४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची सख्या ५०० वर येऊन पोहचली. तर २९ मार्चनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली तर गेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा अंदाज लावला तर अवघ्या ४ दिवसांत १ हजार रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस किती जलदगतीने भारतात पसरतोय हे दिसून येते.

भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे. निजामुद्दीन मरकजचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. मार्च महिन्यात मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देशातील १९ राज्य आणि परदेशातील १६ देशातील जवळपास ८ ते ९ हजार लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.

कार्यक्रमानंतर लॉकडाऊनपर्यंत मरकज येथे अडीच हजार लोक राहिले तर बाकीचे लोक आपापल्या राज्यात निघून गेले. यातील काही लोकांमध्ये कोरोना संक्रमण आढळलं. तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. आता हे लोक कोणकोणत्या राज्यात गेले, कोणाच्या संपर्कात आलेत या सर्वाचा शोध घेणं मोठं आव्हानात्मक आहे. राज्यात युद्धस्तरावर या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेणं सुरु आहे. या लोकांशी संपर्कात आलेल्या आतापर्यंत ९ हजार लोकांना क्वारंटाईन केले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. फक्त दिल्लीत कोरोना व्हायरसचे २९३ रुग्ण आढळून आलेत त्यातील १८२ रुग्ण मरकजशी जोडले गेले होते. राजधानी दिल्लीत मरकज येथे गेलेल्या दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर देशात मरकजशी जोडलेल्या १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या