शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

CoronaVirus: आधीच अडचणीत असलेल्या जनतेकडून पीएम केअरसाठी होतेय वसुली, प्रियंका गांधींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:53 IST

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहेप्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहेअशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे फार हाल होत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान, सर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहे, अशा काळात प्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यात त्या म्हणतात की,’ एक सल्ला: जेव्हा जनता त्रस्त आहे, अन्न, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे. अशा काळात सरकारी वर्गाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली. अशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल,’

या ट्विटमधून प्रिकंका गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. ‘देशातून पळालेल्या बँक चोरांचे ६८ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले आहे. त्याचा हिशोब झाला पाहिजे. संकटकाळात जनतेसमोर पारदर्शकपणे कारभार होणे गरजेचे आहे. यामध्ये जनता आणि सरकार दोघांचेही हित आहे.’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार