शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

CoronaVirus: आधीच अडचणीत असलेल्या जनतेकडून पीएम केअरसाठी होतेय वसुली, प्रियंका गांधींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:53 IST

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहेप्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहेअशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे फार हाल होत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान, सर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहे, अशा काळात प्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यात त्या म्हणतात की,’ एक सल्ला: जेव्हा जनता त्रस्त आहे, अन्न, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे. अशा काळात सरकारी वर्गाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली. अशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल,’

या ट्विटमधून प्रिकंका गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. ‘देशातून पळालेल्या बँक चोरांचे ६८ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले आहे. त्याचा हिशोब झाला पाहिजे. संकटकाळात जनतेसमोर पारदर्शकपणे कारभार होणे गरजेचे आहे. यामध्ये जनता आणि सरकार दोघांचेही हित आहे.’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार