शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:07 IST

ॲस्ट्राझेनेकाचे दुष्परिणाम नगण्य; रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अत्यल्प, १५ राज्यांची मात्र सरकारला काळजी  

हरीश गुप्तानवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी २४४ जिल्ह्यांत रुग्ण सकारात्मक (पॉझिटिव्हिटी रेट) निघण्याचे प्रमाण २० टक्क्यांच्या वर असल्यामुळे केंद्र सरकारला काळजी वाटत आहे. काही जिल्ह्यांत हीच टक्केवारी ३० टक्के आहे. देशातील ७१९ जिल्ह्यांपैकी ४७९ जिल्ह्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त दर असून, त्यातील २४४ जिल्ह्यांत हाच दर २० टक्के आहे. कर्नाटकमध्ये २७, तमिळनाडूत २४, राजस्थान, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १९ टक्के दर आहे. महाराष्ट्रात २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या १६ वर आली आहे.

३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात एकूण पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या खाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा सर्वात जास्त आहे. १६ मे रोजी राज्यात बरे झालेले रुग्ण होते ५९,३१८ तर नव्या रुग्णांची संख्या ३४,३८९ होती. देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा नाही. राज्यातील ७५ जिल्ह्यातील फक्त १४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हरयाणा या लहान राज्यात एकूण २२पैकी १६ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या वर आहे. २३ जिल्ह्यांच्या पंजाबमध्ये २१ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांच्या वर उर्वरित जिल्ह्यांत तो २० टक्क्यांच्या पुढे आहे. दिल्लीतील कोविड-१९ रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तीन जिल्ह्यांत २० टक्क्यांच्या वर, तर  आठ जिल्ह्यांत तो १० टक्क्यांच्या वर आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयातील अधिकृत सुत्रांनी म्हटले की, देशात गेल्या तीन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली असली तरी पॉझिटिव्हिटी दरात घट फार मंद गतीने होत आहे.

१६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. भारतात या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे उत्पादन करण्यात येते. ही लस दिल्यानंतर काही प्रमाणात दुष्परिणाम जाणवतात. भारतात हे प्रमाण १० लाख डोसमागे ०.६१ असे नगण्य आहे. त्या तुलनेत ब्रिटनमध्ये हे प्रमाण दहा लाख डोसमागे चार असे आहे. जर्मनीमध्ये हे प्रमाण ब्रिटनच्या अडीचपट जास्त आहे. कोव्हॅक्सिन लसीचेही धोकादायक दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर काही जणांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याचे आढळून आले होते. मात्र आशियाई तसेच दक्षिण आशियाई लोकांमध्ये हे प्रमाण सत्तर टक्के कमी आहे. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीमुळे रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी निर्माण होत असल्याचे आढळले होते. मात्र भारतात हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे लसीकरण दुष्परिणाम समितीने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या