शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 08:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले.

ठळक मुद्देपाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली.त्या विद्यार्थ्यामध्ये अद्याप कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीतआरोग्य अधिकारी आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार

नवी दिल्ली – चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील बहुतांश शहरात लोकांनी घरातच राहणं पसंत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इटलीहून भारतात परतलेल्या लोकांना भारत-तिबेट सीमेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विलगीकरण कक्षात असताना विद्यार्थ्याने आपल्या पित्याचं छत्र गमावलं. त्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाही. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी दिली.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली. राज्यातील अधिकारी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्याची ओळख सांगू शकत नाही. आयटीबीपी विलगीकरण कक्षातून त्याला २० मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी दिली.

कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्य केंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आलं होतं. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत. यातील हा एक विद्यार्थी आहे. मात्र त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने विशेष सहानुभूतीच्या परिस्थितीत स्वतंत्र केंद्राबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Italyइटलीcorona virusकोरोना वायरस बातम्या