शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 08:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले.

ठळक मुद्देपाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली.त्या विद्यार्थ्यामध्ये अद्याप कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीतआरोग्य अधिकारी आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार

नवी दिल्ली – चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील बहुतांश शहरात लोकांनी घरातच राहणं पसंत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इटलीहून भारतात परतलेल्या लोकांना भारत-तिबेट सीमेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विलगीकरण कक्षात असताना विद्यार्थ्याने आपल्या पित्याचं छत्र गमावलं. त्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाही. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी दिली.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली. राज्यातील अधिकारी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्याची ओळख सांगू शकत नाही. आयटीबीपी विलगीकरण कक्षातून त्याला २० मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी दिली.

कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्य केंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आलं होतं. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत. यातील हा एक विद्यार्थी आहे. मात्र त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने विशेष सहानुभूतीच्या परिस्थितीत स्वतंत्र केंद्राबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Italyइटलीcorona virusकोरोना वायरस बातम्या