शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 08:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले.

ठळक मुद्देपाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली.त्या विद्यार्थ्यामध्ये अद्याप कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीतआरोग्य अधिकारी आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार

नवी दिल्ली – चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील बहुतांश शहरात लोकांनी घरातच राहणं पसंत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इटलीहून भारतात परतलेल्या लोकांना भारत-तिबेट सीमेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विलगीकरण कक्षात असताना विद्यार्थ्याने आपल्या पित्याचं छत्र गमावलं. त्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाही. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी दिली.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली. राज्यातील अधिकारी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्याची ओळख सांगू शकत नाही. आयटीबीपी विलगीकरण कक्षातून त्याला २० मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी दिली.

कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्य केंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आलं होतं. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत. यातील हा एक विद्यार्थी आहे. मात्र त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने विशेष सहानुभूतीच्या परिस्थितीत स्वतंत्र केंद्राबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Italyइटलीcorona virusकोरोना वायरस बातम्या