शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
3
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
4
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
5
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
6
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
7
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
8
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
9
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
10
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
11
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
12
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
13
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
14
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
15
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
16
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
17
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
18
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
19
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
20
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 08:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले.

ठळक मुद्देपाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली.त्या विद्यार्थ्यामध्ये अद्याप कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीतआरोग्य अधिकारी आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार

नवी दिल्ली – चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील बहुतांश शहरात लोकांनी घरातच राहणं पसंत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इटलीहून भारतात परतलेल्या लोकांना भारत-तिबेट सीमेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विलगीकरण कक्षात असताना विद्यार्थ्याने आपल्या पित्याचं छत्र गमावलं. त्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाही. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी दिली.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली. राज्यातील अधिकारी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्याची ओळख सांगू शकत नाही. आयटीबीपी विलगीकरण कक्षातून त्याला २० मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी दिली.

कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्य केंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आलं होतं. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत. यातील हा एक विद्यार्थी आहे. मात्र त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने विशेष सहानुभूतीच्या परिस्थितीत स्वतंत्र केंद्राबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Italyइटलीcorona virusकोरोना वायरस बातम्या