शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 08:20 IST

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनामुळे भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश त्रस्त असताना पाकिस्तान सीमेपलिकडून भारतावर गोळीबार करण्यामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या देशांत अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीय. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लोकांमध्ये कमालीचा राग आहे. अशातच भारतामध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची तयारी भारताने सुरु करून माणुसकीचा नवा आदर्श जगसमोर ठेवला आहे. 

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. अशातच परदेशांमध्ये लाखावर पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेले आहेत. या नागरिकांनाही देशात आणण्याचे सौजन्य इम्रान सरकार दाखवत नाहीय. भारतामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या १८० पाकिस्तानी नागरिकांनाही पाकिस्तानने वाऱ्यावर सोडले आहे. यावर पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताकडेच मदत करण्याची विनवणी केली आहे. 

यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माणुसकीच्या नात्यातून या लोकांना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुरखोरी करत आहे. गेल्याच आठवड्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये ५ भारतीय पॅरा ट्रूपर्सही होते. एवढे असूनही भारत पाकिस्तानची मदत करत आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताला सांगितले आहे की, अडकलेले नागरिक पाकिस्तानात येऊ पाहत आहेत. सुत्रांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तानी उच्चायोगाकडून माहिती मिळाली आहे की त्यांचे १८० नागरिक आजही भारतात आहेत. त्याना माघारी यायचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या परत जाण्यासाठी चर्चा सुरू असून गेल्या महिन्यात पाच पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीर