शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 08:20 IST

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनामुळे भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश त्रस्त असताना पाकिस्तान सीमेपलिकडून भारतावर गोळीबार करण्यामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या देशांत अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीय. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लोकांमध्ये कमालीचा राग आहे. अशातच भारतामध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची तयारी भारताने सुरु करून माणुसकीचा नवा आदर्श जगसमोर ठेवला आहे. 

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. अशातच परदेशांमध्ये लाखावर पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेले आहेत. या नागरिकांनाही देशात आणण्याचे सौजन्य इम्रान सरकार दाखवत नाहीय. भारतामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या १८० पाकिस्तानी नागरिकांनाही पाकिस्तानने वाऱ्यावर सोडले आहे. यावर पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताकडेच मदत करण्याची विनवणी केली आहे. 

यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माणुसकीच्या नात्यातून या लोकांना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुरखोरी करत आहे. गेल्याच आठवड्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये ५ भारतीय पॅरा ट्रूपर्सही होते. एवढे असूनही भारत पाकिस्तानची मदत करत आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताला सांगितले आहे की, अडकलेले नागरिक पाकिस्तानात येऊ पाहत आहेत. सुत्रांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तानी उच्चायोगाकडून माहिती मिळाली आहे की त्यांचे १८० नागरिक आजही भारतात आहेत. त्याना माघारी यायचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या परत जाण्यासाठी चर्चा सुरू असून गेल्या महिन्यात पाच पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीर