शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कर्मचाऱ्यांना ४ महिने विना पगार रजेवर पाठवणार; हॉटेल उद्योगातील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 08:07 IST

कोरोना संकटामुळे बर्‍याच उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे

ठळक मुद्देमहामारीच्या जाळ्यात अडकल्याने हॉटेल व्यवसाय ढासळला आहेअमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचार्‍यांना फटका४ महिन्यांसाठी पगाराशिवाय रजेवर पाठविण्याचा निर्णय

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. बहुतांश देशांनी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या काळात इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे कोरोनानंतर अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारतातही ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

देशात आतापर्यंत २० हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक कंपन्या, कारखाने बंद आहेत. कामकाज बंद असल्याने मालकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. अशातच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना संकटामुळे बर्‍याच उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे. या महामारीच्या जाळ्यात अडकल्याने हॉटेल व्यवसाय ढासळला आहे. या व्यवसायाशी संबंधित कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी ओयो रूम्सने बुधवारी अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचार्‍यांना ४ महिन्यांसाठी पगाराशिवाय रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. यासह कंपनीने कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये २५ टक्क्यांनी कपात करण्याचे म्हटलं आहे.

बुधवारी ओयोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी टाऊन हॉलमध्ये कर्मचार्‍यांशी बैठक घेतली. या दरम्यान रोहित यांनी कंपनीच्या आर्थिक नुकसानीमुळे कर्मचार्‍यांची कपात करण्याबाबत सांगितले. अल्पावधीसाठी कंपनी काही कर्मचार्‍यांना विना पगार रजेवर पाठवणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली यामुळे कंपनीने भारतीय कर्मचार्‍यांना ४ मे पासून रजेवर पाठविण्याची घोषणा केली आहे.

रोहित कपूर म्हणाले की, आमच्यासाठी हा एक कठीण प्रवास आहे. परिस्थिती बिघडताना पाहून कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. कर्मचार्‍यांना २५ टक्के वेतन कपातीचा निर्णय मान्य करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम एप्रिल ते जुलै २०२० पर्यंतच्या पगारावर होईल असं ते म्हणाले, तर कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीची परिस्थिती बिकट आहे. कंपनीचा महसूल आणि व्यवसायात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर याचे परिणाम पाहायला मिळत आहेत असं त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :hotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्या