शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Coronavirus: कर्मचाऱ्यांना ४ महिने विना पगार रजेवर पाठवणार; हॉटेल उद्योगातील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 08:07 IST

कोरोना संकटामुळे बर्‍याच उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे

ठळक मुद्देमहामारीच्या जाळ्यात अडकल्याने हॉटेल व्यवसाय ढासळला आहेअमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचार्‍यांना फटका४ महिन्यांसाठी पगाराशिवाय रजेवर पाठविण्याचा निर्णय

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. बहुतांश देशांनी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या काळात इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे कोरोनानंतर अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारतातही ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

देशात आतापर्यंत २० हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक कंपन्या, कारखाने बंद आहेत. कामकाज बंद असल्याने मालकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. अशातच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना संकटामुळे बर्‍याच उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे. या महामारीच्या जाळ्यात अडकल्याने हॉटेल व्यवसाय ढासळला आहे. या व्यवसायाशी संबंधित कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी ओयो रूम्सने बुधवारी अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचार्‍यांना ४ महिन्यांसाठी पगाराशिवाय रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. यासह कंपनीने कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये २५ टक्क्यांनी कपात करण्याचे म्हटलं आहे.

बुधवारी ओयोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी टाऊन हॉलमध्ये कर्मचार्‍यांशी बैठक घेतली. या दरम्यान रोहित यांनी कंपनीच्या आर्थिक नुकसानीमुळे कर्मचार्‍यांची कपात करण्याबाबत सांगितले. अल्पावधीसाठी कंपनी काही कर्मचार्‍यांना विना पगार रजेवर पाठवणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली यामुळे कंपनीने भारतीय कर्मचार्‍यांना ४ मे पासून रजेवर पाठविण्याची घोषणा केली आहे.

रोहित कपूर म्हणाले की, आमच्यासाठी हा एक कठीण प्रवास आहे. परिस्थिती बिघडताना पाहून कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. कर्मचार्‍यांना २५ टक्के वेतन कपातीचा निर्णय मान्य करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम एप्रिल ते जुलै २०२० पर्यंतच्या पगारावर होईल असं ते म्हणाले, तर कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीची परिस्थिती बिकट आहे. कंपनीचा महसूल आणि व्यवसायात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर याचे परिणाम पाहायला मिळत आहेत असं त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :hotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्या