शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धास्तीनं लग्न ठरलेल्या २७ वर्षीय युवकाने लिहिलं थेट पंतप्रधानांना पत्र, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 07:36 IST

ओडिशातील ग्रामविकास विभागाच्या शाळेत काम करणारा रोहित कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देमोदींना पत्र लिहून त्याच्या आई-वडिलांना समजवण्याची विनंती केलीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांना एकत्र आणून गर्दी करण्याची भीती आई-वडील माझे ऐकत नाहीत, तुम्हीच सांगा

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जगात ४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १८ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. वाऱ्याच्या वेगात पसरणाऱ्या कोरोनामुळे भारतातही ५३६ जणांना लागण झाली आहे तर आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील २१ दिवस अख्खा देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. पण लोकांनी २१ दिवस घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी आहे. बाकीच्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशाप्रकारे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.

कोरोनामुळे लग्नसराईच्या दिवसात अनेक लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत. ओडिशा येथील एका २७ वर्षीय युवकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्याच्या आई-वडिलांना समजवण्याची विनंती केली आहे. पुढील महिन्यात या युवकाचे लग्न असून त्यात पाहुण्यांची रीघ लागणार आहेत. त्यामुळे पाहुण्यांची गर्दी होऊ नये यासाठी माझ्या आई-वडिलांना समजावा असं त्या युवकाने पत्रात लिहिलं आहे.

ओडिशातील ग्रामविकास विभागाच्या शाळेत काम करणारा रोहित कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कुमार याचे लग्न एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याने पत्रात नमूद केले आहे की, मी माझ्या कुटुंबातील लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, पाहुण्यांची गर्दी न करता लग्न करुया, पण ते ऐकत नाहीत. कारण त्यांना अपेक्षा आहे की, एका महिन्यात परिस्थिती सर्वसामान्य होईल. पण मला भीती आहे की, एका महिन्यात परिस्थिती ठिक झाली तरी लोकांना एकत्र करुन गर्दी करणं धोक्याचं आहे असं त्याने सांगितले.

त्यामुळे हे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने माध्यमांशीही संवाद साधला. पंतप्रधान मोदी माझ्या घरच्यांना समजावतील तर घरातलेही त्यांचे ऐकतील कारण माझ्या घरातले नरेंद्र मोदींचे चाहते आहेत असं कुमार याने सांगितले.  आजपासून देशभरात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर या २१ दिवसात कोरोनावर मात नाही केलं तर मोठा अनर्थ घडेल अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनीही घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न