शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Coronavirus: गुड न्यूज! देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात मागील १४ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:44 IST

१४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत.

ठळक मुद्देदेशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाहीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लोकांना दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहे. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

तसेच प्रत्येक अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. टाइमली रिस्पॉन्ससाठी कटिंग एज टेक्नोलॉजीचा वापर करणं गरजेचे आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लाईव्ह केस ट्रेकिंग, केस मॅनेजमेंट आणि कंटनेमेंट प्लान लागू करण्यासोबतच त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचंही काम केले असं लव अग्रवाल यांनी सांगितले.

या २५ जिल्ह्यात कर्नाटकातील ४, छत्तीसगड ३, केरळ २, बिहार ३, आणि हरियाणातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यात एकूण ८८८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यातील २८५ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. तर पाच राज्यात मिळून १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये १०० तासात एकही रुग्ण नाही. ७ रुग्ण बरे झाले

उत्तराखंडमध्येही चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, मागील १०० तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ७ रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही जिल्ह्यात अद्याप कर्फ्यू लावण्यात आला आहे.

या २५ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

गोंदिया-महाराष्ट्र

राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर - छत्तीसगड

देवानगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगु - कर्नाटक

वायनाड आणि कोट्टायम - केरळ

वेस्ट इंफाल - मणिपूर

दक्षिण गोवा-गोवा

राजौरी - जम्मू-काश्मीर

आयझॉल वेस्ट-मिझोरम

माहे-पुडुचेरी

एसबीएस नगर-पंजाब

पटना, नालंदा, मुगर-बिहार

प्रतापगड - राजस्थान

पानीपत, रोहतक, सिरसा-हरियाणा

पौरी गढवाल - उत्तराखंड

भद्रद्री कोत्तागुडम - तेलंगणा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या