शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

Coronavirus: गुड न्यूज! देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात मागील १४ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:44 IST

१४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत.

ठळक मुद्देदेशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाहीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लोकांना दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहे. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

तसेच प्रत्येक अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. टाइमली रिस्पॉन्ससाठी कटिंग एज टेक्नोलॉजीचा वापर करणं गरजेचे आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लाईव्ह केस ट्रेकिंग, केस मॅनेजमेंट आणि कंटनेमेंट प्लान लागू करण्यासोबतच त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचंही काम केले असं लव अग्रवाल यांनी सांगितले.

या २५ जिल्ह्यात कर्नाटकातील ४, छत्तीसगड ३, केरळ २, बिहार ३, आणि हरियाणातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यात एकूण ८८८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यातील २८५ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. तर पाच राज्यात मिळून १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये १०० तासात एकही रुग्ण नाही. ७ रुग्ण बरे झाले

उत्तराखंडमध्येही चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, मागील १०० तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ७ रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही जिल्ह्यात अद्याप कर्फ्यू लावण्यात आला आहे.

या २५ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

गोंदिया-महाराष्ट्र

राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर - छत्तीसगड

देवानगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगु - कर्नाटक

वायनाड आणि कोट्टायम - केरळ

वेस्ट इंफाल - मणिपूर

दक्षिण गोवा-गोवा

राजौरी - जम्मू-काश्मीर

आयझॉल वेस्ट-मिझोरम

माहे-पुडुचेरी

एसबीएस नगर-पंजाब

पटना, नालंदा, मुगर-बिहार

प्रतापगड - राजस्थान

पानीपत, रोहतक, सिरसा-हरियाणा

पौरी गढवाल - उत्तराखंड

भद्रद्री कोत्तागुडम - तेलंगणा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या