शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

CoronaVirus : खरच, हवा आणि प्राण्यांपासून कोरोना पसरतो...? सरकारनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:47 IST

एवढी भीषण आणि दीर्घ कोरोना लाट, जिचा आपण सामना करत आहोत. तिच्याबाबतीत पूर्वानुमान लावण्यात आला नव्हता. कोरोना हवेतून पसरत नाही, असे विजय राघवन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार, मात्र, ती नेमकी केव्हा येणार आणि कशा स्वरुपाची असेल, हे सांगणे सध्या कठीण आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवे, असे केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी म्हटले आहे. (CoronaVirus NITI aayog member dr vk paul says coronavirus is not spreading through animals)

एवढेच नाही, तर एवढी भीषण आणि दीर्घ कोरोना लाट, जिचा आपण सामना करत आहोत. तिच्याबाबतीत पूर्वानुमान लावण्यात आला नव्हता, असेही विजय राघवन म्हणाले. याच बरोबर कोरोना हवेतून पसरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे, की कोरोना हा आजार प्राण्यांपासून पसरत नाहीय, तर हे मानसांतून-मानसांतील ट्रान्समिशन आहे. 

कोरोनाचा कहर वाढणार -येणाऱ्या काही दिवसांत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू शकतो. सध्याच्या तुलनेत मृतांची संख्या दुप्पटीने वाढू शकते, असा अंदाज बेंगळुरूतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने वर्तवला आहे. कोरोनाचे सध्याचे आकडे विचारात घेऊन गणिती प्रारुपाच्या आधारे त्याचे विश्लेषण करून या टीमने हा अंदाज वर्तवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास 11 जूनपर्यंत भारतात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा 4 लाख 4 हजारपर्यंत असेल, अशी शक्यता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या टीमने वर्तवली आहे.

जुलै अखेरपर्यंत भारतात कोरोनामुळे 10 लाख 18 हजार 879 जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटचे वर्तवला आहे. भारतासारख्या देशात कोरोनासंदर्भात कोणताही अंदाज बांधणे अवघड आहे. कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग, टेस्टिंग योग्य पद्धतीने झाल्यास बराच फरक पडतो. भारतात सध्याच्या घडीला अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, असेही हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर