शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

VIDEO: सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट हातच जोडले; पाहा नेमके काय घडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 17:42 IST

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरुन अर्थमंत्री विरोधकांवर भडकल्या; सोनिया, राहुल गांधींवर निशाणा

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे होत आहेत. हाताला काम नसल्यानं लाखो मजूर, कामगार शहरं सोडून गावाकडे जाऊ लागले आहेत. या ज्वलंत प्रश्नावरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी यावरुन राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असं सीतारामन पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी काल स्थलांतरित मजुरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावरुनही सीतारामन यांनी टीका केली. राहुल ड्रामेबाजी करत असून त्यांनी मजुरांचा वेळ वाया घालवला, असं सीतारामन म्हणाल्या.स्थलांतरित मजुरांच्या विषयाचं राजकारण करू नका, असं आवाहन विरोधकांना करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. 'स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्व राज्य सरकारांच्या सोबतीनं काम करत आहोत. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नी त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असं मी त्यांना हात जोडून सांगू इच्छिते,' अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी सोनिया गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन