शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

CoronaVirus News : ३० जिल्हे, महापालिका क्षेत्रांत कडक निर्बंध राहणार; वाढत्या संसर्गामुळे कसलीही सूट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 06:55 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : निवडलेले हे जिल्हे व महापालिका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांत आहेत.

नवी दिल्ली : देशभर लागू करण्यात आलेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी संपुष्टात येत आहे. उद्यापासून (दि. १८ मे) देशात पुढचा लॉकडाऊन लागू करण्याआधी आरोग्य मंत्रालयाने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. यात देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असलेल्या ३० जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात कसलीही सवलत न देता कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.निवडलेले हे जिल्हे व महापालिका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांत आहेत. या ठिकाणी रुग्ण दुपटीचा दर, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणि उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज सुमारे ३००० नवे बाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे लॉकडाउन पाळताना काही परिसरात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.ही आहेत ती शहरेमहाराष्ट्र : मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूरगुजरात : वडोदरा, अहमदाबाद, सुरतमध्य प्रदेश : भोपाळ, इंदूरआंध्र प्रदेश : कुरनूलराजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूरदिल्ली : बहुतांश रेजझोनओडिशा : बरहमपूरतमिळनाडू : विल्लुपुरम, चेंगलपट्टु, कुड्डालोर, आरियालुर, ग्रेटर चेन्नई, तिरुवल्लूरपश्चिम बंगाल : हावडा, कोलकातातेलंगण : ग्रेटर हैदराबादपंजाब : अमृतसरउत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ४६ हजार कोरोनाबाधित देशातील केवळ ५ शहरांतदेशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजारांच्या आसपास असणारा बाधितांचा आकडा आज ९० हजारांच्याही पुढे गेला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई या पाच शहरांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. या पाच शहरांतील बाधितांचा आकडा ४६ हजारांच्या आसपास आहे.विशेषत: केंद्राने लॉकडाऊनमध्ये काहीबाबतीत शिथिलता दिल्यानंतर हा आकडा वाढत चालला आहे. त्यात स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर मूळ गावी परतू लागल्याने बाधितांमध्ये भर पडत आहे. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज ५० दिवस पूर्ण झाले.गुजरातमध्ये शनिवारी आढळलेल्या १०५७ बाधितांपैकी ९७३ एकट्या अहमदाबादमधील आहेत. या शहरात ८१४४ जणांना ही बाधा झाली आहे, तर ४९३ जणांचा यात बळी गेला आहे. गुजरातमधील रुग्णांचा एकूण आकडा १० हजार ९८९ वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीचा आकडा ९,३३३ वर गेला आहे. दिल्लीचा बहुतांश भाग रेड झोनमध्ये आहे. शनिवारी दिल्लीत नवे ४३८ रुग्ण आढळले. आतापर्यंत दिल्लीत १२९ जणांचा कोरोनांमुळे बळी गेला आहे.तमिळनाडूमध्ये ४७७ नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा १० हजार ५८५ वर पोहोचला आहे.महाराष्ट्रातील आकडाही झपाट्याने वाढत असून तो 30 हजार 706 हून अधिक झाला आहे. दिवसभरात नव्या 1606 रूग्णांचे निदान झाले. तर राज्यात 7 हजार 88 जण यातून पूर्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या