शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus News: ‘ऑक्सिजन वॉरिअर्स’चे मोदी यांनी मानले आभार; ‘मन की बात’मधून साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:04 IST

१०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.

नवी दिल्ली : कोरोना महामारीशी लढताना देशात ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले होते. त्यातून मार्ग काढत रुग्णांच्या प्राणांची रक्षा करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. त्यांनी ७७ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधला. देश संपूर्ण शक्तिनीशी कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. १०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.मोदी म्हणाले, की निसर्ग, अम्फान, तौक्ते, यास यांसारख्या चक्रीवादळांनी तडाखा दिला. चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या सर्व राज्यातील लोकांनी मोठे धैर्य दाखविले आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासानेही एकत्रितपणे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून अधिक जीवित हानी टाळली. पूर्वीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या चक्रीवादळांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईचाही उल्लेख केला. रेल्वे, जहाज तसेच विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्ससोबतही मोदींनी संवाद साधला. त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करताना मोदी म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. हे एक खूप मोठे आव्हान होते. देशाच्या एका कोपऱ्यातून दुसरीकडे ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे आव्हान होते. मात्र, ऑक्सिजन एक्स्प्रेस, टँकर्स, हवाई दलाच्या जवानांनी या कठीण परिस्थितीत मदत करून संकटावर मात केली, असे मोदी म्हणाले. देशात कोरोना टेस्टिंग वाढल्याचा उल्लेखही मोदींनी केला. सुरुवातीला शभर आणि हजारांच्या घरात चाचणी व्हायची. आज दररोज २० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात येतात. संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने घेणे धोकादायक काम आहे. नमुने घेणाऱ्यांना सतत पीपीई किट घालून राहावे लागते. हे खूप सेवेचे काम असल्याचे मोदी म्हणाले.सरकारच्या ७ वर्षांचा उल्लेखसरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या मंत्रावर देश चालला. या ७ वर्षात अनेक कठीण परीक्षा आम्ही दिल्या. कोरोनाच्या स्वरूपात मोठी परीक्षा सुरूच आहे. मोठमोठे देशही कोरोनाच्या तडाख्यातून वाचू शकलेले नाहीत, असे मोदी म्हणाले. देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड नाहीदेशाविरोधात कट रचणाऱ्यांना आता भारत जोरदार प्रत्युत्तर देतो. हे पाहून आपला आत्मविश्वास वाढतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भारत तडजोड करत नाही. सैन्याची ताकद वाढते. हे पाहून वाटते, की आपण योग्य मार्गावर असल्याचे मोदी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी