शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News: ‘ऑक्सिजन वॉरिअर्स’चे मोदी यांनी मानले आभार; ‘मन की बात’मधून साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:04 IST

१०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.

नवी दिल्ली : कोरोना महामारीशी लढताना देशात ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले होते. त्यातून मार्ग काढत रुग्णांच्या प्राणांची रक्षा करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. त्यांनी ७७ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधला. देश संपूर्ण शक्तिनीशी कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. १०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.मोदी म्हणाले, की निसर्ग, अम्फान, तौक्ते, यास यांसारख्या चक्रीवादळांनी तडाखा दिला. चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या सर्व राज्यातील लोकांनी मोठे धैर्य दाखविले आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासानेही एकत्रितपणे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून अधिक जीवित हानी टाळली. पूर्वीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या चक्रीवादळांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईचाही उल्लेख केला. रेल्वे, जहाज तसेच विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्ससोबतही मोदींनी संवाद साधला. त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करताना मोदी म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. हे एक खूप मोठे आव्हान होते. देशाच्या एका कोपऱ्यातून दुसरीकडे ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे आव्हान होते. मात्र, ऑक्सिजन एक्स्प्रेस, टँकर्स, हवाई दलाच्या जवानांनी या कठीण परिस्थितीत मदत करून संकटावर मात केली, असे मोदी म्हणाले. देशात कोरोना टेस्टिंग वाढल्याचा उल्लेखही मोदींनी केला. सुरुवातीला शभर आणि हजारांच्या घरात चाचणी व्हायची. आज दररोज २० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात येतात. संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने घेणे धोकादायक काम आहे. नमुने घेणाऱ्यांना सतत पीपीई किट घालून राहावे लागते. हे खूप सेवेचे काम असल्याचे मोदी म्हणाले.सरकारच्या ७ वर्षांचा उल्लेखसरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या मंत्रावर देश चालला. या ७ वर्षात अनेक कठीण परीक्षा आम्ही दिल्या. कोरोनाच्या स्वरूपात मोठी परीक्षा सुरूच आहे. मोठमोठे देशही कोरोनाच्या तडाख्यातून वाचू शकलेले नाहीत, असे मोदी म्हणाले. देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड नाहीदेशाविरोधात कट रचणाऱ्यांना आता भारत जोरदार प्रत्युत्तर देतो. हे पाहून आपला आत्मविश्वास वाढतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भारत तडजोड करत नाही. सैन्याची ताकद वाढते. हे पाहून वाटते, की आपण योग्य मार्गावर असल्याचे मोदी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी