शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपीने घटले नाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण; आजार रोखण्यातही अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 06:35 IST

प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती.

नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही किंवा हा आजार रोखलाही जात नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने यासंदर्भात एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती. तिच्या निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोनाची माफक प्रमाणात लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले व ज्यांच्यावर हे उपचार करण्यात आले नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे सुमारे २८ दिवस निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण व आजार रोखला जाणे याबाबत प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरली नसल्याचे दिसून आले.

कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या लोकांचे रक्त या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिले जाते. हे लोक बरे व्हावेत यासाठी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपी वापरली जाते. कोरोनातून बºया झालेल्या लोकांच्या रक्तात अँटीबॉडीज असतात. त्यांच्यामुळे रुग्ण आजाराविरोधात मुकाबला करू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटले होते. प्लाझ्मा थेरपी कितपत प्रभावी आहे यासंदर्भात चीन व नेदरलँड्स येथे यापूर्वी करण्यात आलेली पाहणी अर्धवट राहिली होती.

परिणामकारकता दिसली नाही

प्लाझ्मा थेरपी किती उपयोगी ठरते, हे तपासून पाहण्यासाठी आयसीएमआरने देशातील ३९ रुग्णालयांमध्ये त्याविषयीची पाहणी २२ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान केली. त्यामध्ये ४६४ जणांनी सहभाग घेतला. त्यातील २३५ जणांना प्लाझ्मा थेरपीचे उपचार देण्यात आले, तर २२९ जणांना प्लाझ्मा देण्यात आला नाही. त्यापैकी प्लाझ्मा दिलेल्यांपैकी ३४ जण, तर न दिलेल्यांपैकी ३१ जण मरण पावले. कोरोना रुग्णांच्या उपचारांत प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी काही देशांमध्ये देण्यात आली आहे. मात्र, कोरोनावर प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरत नाही, हे आयसीएमआरच्या पाहणीत दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत