शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

CoronaVirus News: कोरोना चाचण्यात महाराष्ट्र, तामिळनाडू अग्रेसर; भारताने ३० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 23:30 IST

महाराष्ट्रात ३.३२ लाख चाचण्या

नवी दिल्ली : भारताने सोमवारी कोविड-१९ च्या ३० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला व रोज एक लाख चाचण्या करण्याची क्षमता दाखवली. भारताने सोमवार सकाळी नऊवाजेपर्यंत ३०.३३ लाख चाचण्या केल्या होत्या व कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ६९७७ असा विक्रमी आकडा गाठला व एका दिवसात १५४ मृत्यू नोंदले.

महाराष्ट्र व तमिळनाडूने देशात अनुक्रमे ३.३२ व ३.८५ लाख चाचण्या करून वरचे स्थान मिळवले. बिहारमध्ये फक्त ५३१७५ तर उत्तर प्रदेशात २.१४ लाख चाचण्या झाल्या. या दोन्ही राज्यांत चाचण्यांची क्षमता वाढत आहे. अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्ली दर दहा लाख लोकसंख्येमागे ८२११ चाचण्या करून वरच्या स्थानी आहे तर महाराष्ट्रात हीच संख्या २७०१ आहे. बिहार दर १० लाखांमागे देशात चाचण्यांत सरासरी ४३८ तर उत्तर प्रदेश ९३९ पायरीवर आहे.

चाचण्यांचे प्रमाण जास्त असूनही तज्ज्ञांना चिंता आहे ती पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होत नसल्याचे. ते प्रमाण २४ मेपर्यंत ४.४ टक्के होते. दुसरे म्हणजे भारतात १६ मेपर्यंत रुग्ण संख्येचा कळस गाठला जाणार होता तो आता जूनअखेर असेल. कित्येक दशलक्ष स्थलांतरित कामगार/मजूर आपापल्या राज्यांत स्थिरावत आहेत. ग्रामीण भागांत चाचण्यांचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) सदस्याने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले की, महानगरांबाहेर असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे आव्हान आहे ते प्रशिक्षित कर्मचारी व चाचण्यांसाठी आवश्यक परिस्थितीचा अभाव असल्यामुळे. भारतातील मृत्यूदरदेखील वाढल्याचे दिसते भलेही तो सध्या तीन टक्क्यांच्या खाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र