शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना चाचण्यात महाराष्ट्र, तामिळनाडू अग्रेसर; भारताने ३० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 23:30 IST

महाराष्ट्रात ३.३२ लाख चाचण्या

नवी दिल्ली : भारताने सोमवारी कोविड-१९ च्या ३० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला व रोज एक लाख चाचण्या करण्याची क्षमता दाखवली. भारताने सोमवार सकाळी नऊवाजेपर्यंत ३०.३३ लाख चाचण्या केल्या होत्या व कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ६९७७ असा विक्रमी आकडा गाठला व एका दिवसात १५४ मृत्यू नोंदले.

महाराष्ट्र व तमिळनाडूने देशात अनुक्रमे ३.३२ व ३.८५ लाख चाचण्या करून वरचे स्थान मिळवले. बिहारमध्ये फक्त ५३१७५ तर उत्तर प्रदेशात २.१४ लाख चाचण्या झाल्या. या दोन्ही राज्यांत चाचण्यांची क्षमता वाढत आहे. अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्ली दर दहा लाख लोकसंख्येमागे ८२११ चाचण्या करून वरच्या स्थानी आहे तर महाराष्ट्रात हीच संख्या २७०१ आहे. बिहार दर १० लाखांमागे देशात चाचण्यांत सरासरी ४३८ तर उत्तर प्रदेश ९३९ पायरीवर आहे.

चाचण्यांचे प्रमाण जास्त असूनही तज्ज्ञांना चिंता आहे ती पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होत नसल्याचे. ते प्रमाण २४ मेपर्यंत ४.४ टक्के होते. दुसरे म्हणजे भारतात १६ मेपर्यंत रुग्ण संख्येचा कळस गाठला जाणार होता तो आता जूनअखेर असेल. कित्येक दशलक्ष स्थलांतरित कामगार/मजूर आपापल्या राज्यांत स्थिरावत आहेत. ग्रामीण भागांत चाचण्यांचे मोठे आव्हान आहे. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या (आरोग्य) सदस्याने नाव न सांगण्याच्या अटींवर म्हटले की, महानगरांबाहेर असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे आव्हान आहे ते प्रशिक्षित कर्मचारी व चाचण्यांसाठी आवश्यक परिस्थितीचा अभाव असल्यामुळे. भारतातील मृत्यूदरदेखील वाढल्याचे दिसते भलेही तो सध्या तीन टक्क्यांच्या खाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र