शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लॉकडाऊनने ७८ हजार मृत्यू रोखले; सक्षम गटाचे डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 04:31 IST

डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशात २० लाख कोरोना रुग्ण होणे आणि ७८ हजार मृत्यू रोखता आले, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ वरील सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. देशात कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) चाचण्यांची संख्या वाढली तशी रोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे असे की, योग्यवेळी लॉकडाऊन लागू केले नसते तर आज देशात १४ ते २९ लाख रुग्णअसते.डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत. देशात स्थिती नियंत्रित करण्यात मदत मिळत आहे ही चांगली बाब आहे आणि कोरोना रुग्ण दोनपट होण्याचा दर आता १३.३ वर आला तर रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के झाला आहे.’’डॉ. पॉल म्हणाले की, ‘‘अनेक मॉडेलमधून हे समोर येत होते की, देशात कोविड-१९ मुळे ३७ ते ७८ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकला असता व योग्यवेळी लॉकडाऊन लागू केला नसता तर १४ ते २९ लाख रुग्ण असते.लॉकडाऊन जाहीर केला आणि कोट्यवधी लोकांनी घरातच राहून लॉकडाऊनची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे जगात इतर देशांत कोविड-१९ चा फैलाव झाला तसा आपल्या देशात झाला नाही.’’५ राज्यात ८0% रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू या पाच राज्यांत जवळपास ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दहा राज्यांत (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडू,राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश) ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखता आले, असेही डॉ. पॉल म्हणाले.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘‘देशात कोविड-१९ चा मृत्यूदर ३.१३ वरून ३.०२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत ३२३४ रुग्ण बरे झाले तर ४८५३४ रुग्ण बरे झाले आहेत.’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या