शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

CoronaVirus News: अमेरिकन तज्ज्ञानं सांगितली भारताची 'ताकद'; कोरोना संकटात देशासाठी 'पॉझिटिव्ह' न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 14:59 IST

CoronaVirus News: कोरोना महामारीच्या हाताळणीवरून पाश्चिमात्य देशांनी काही दिवसांपूर्वीच भारतावर टीका केली होती

नवी दिल्ली: कोरोना महामारीची हाताळणी चुकीच्या पद्धतीनं केल्याची टीका पाश्चिमात्य माध्यमांकडून गेल्या काही दिवसांपासून भारतावर करण्यात येत आहे. जगातील अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी भारतातील कोरोना स्थितीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर आता अमेरिकेन परराष्ट्र धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ते अरब न्यूजशी बोलत होते.ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...भारतातील राजकीय ढाचा स्थिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोन्हीही राजकीयदृष्ट्या अतिशय सुरक्षित आहेत. त्यामुळे बाकीच्या देशांना भारताबद्दल ईर्ष्या वाटते. भाजप आणि मोदी इतके सुरक्षित आहेत की इतर देश केवळ त्यांच्याबद्दल असुया बाळगू शकतात, असं मत हल्समन यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढल्याचा थेट परिणाम भारतातील आरोग्य यंत्रणेवर पाहायला मिळाला. आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली. त्यावरून पाश्चिमात्य माध्यमांनी भारतावर कडवी टीका केली. पण तरीही भारतातील राजकीय यंत्रणा पूर्णपणे स्थिर आहे. ती अजिबात डळमळीत झालेली नाही, असं हल्समन यांनी सांगितलं.धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळभारतातील लोकसंख्येचं स्वरुप भारताचं बलस्थान असल्याचं हल्समन यांनी सांगितलं. 'भारतातील राजकीय यंत्रणा अतिशय मजबूत आहे. याशिवाय भारताला लोकसंख्येचादेखील फायदा मिळतो. २०२४ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनला मागे टाकलेलं असेल. भारताची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. तर ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या खाली आहे,' अशी आकडेवारी हल्समन यांनी सांगितली.भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी खोटी नाही. २०५० पर्यंत संपूर्ण जगाच्या जीडीपीमध्ये भारताचं योगदान १५ टक्के असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११.५ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी