शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

CoronaVirus News: दिलासादायक! महिनाभरात ओसरेल कोरोनाचा कहर; केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:46 IST

लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख मागील काही दिवसांपासून पुन्हा वरचढ होऊ लागला आहे. निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता त्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत आहे. तरीही जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचे प्रमाण कमीच आहे. तसेच लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव आटोक्यात आला आहे. 

तूर्तास कोरोनाचा आलेख चढता असला तरी मार्चच्या अखेरपर्यंत बाधितांची संख्या कमी होईल, असा दावा राजीव करंदीकर (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. शेखर मांडे (सीएसआयआर मुख्यालय) आणि प्राध्यापक एम. विद्यासागर (आयआयटी, हैदराबाद) या तज्ज्ञांनी एका लेखात केला आहे. ‘द केस ऑफ रॅपिड व्हॅक्सिनेशन ऑफ इंडिया ॲण्ड रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ असे या  लेखाचे शीर्षक आहे. तीनही लेखक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आहेत.

 लसीचा परिणाम

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लसींमुळे कोरोनापासून दीर्घकाळपर्यंत संरक्षण होऊ शकते. लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागत आहे. ४० ते ८० टक्के लसीची परिणामकारकता असेल.

गाफील राहून चालणार नाही

देशात सद्य:स्थितीत कोरोनाचा पहिलाच टप्पा संपुष्टात आला आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणे बाकी असून या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.इटली, ब्रिटन, अमेरिका यांच्याप्रमाणे भारताला गाफील राहता कामा नये

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत