शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : धोका वाढला! देशात एका दिवसात ७० हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 05:42 IST

CoronaVirus News : रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ६९,६५२ नवे रुग्ण आढळून आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या आता २० लाख ९६ हजार झाली असून, अशा व्यक्तींचे प्रमाण ७३.९१ टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८,३६,९२५ वर पोहोचली असून गुरुवारी ९७७ जण या आजाराने मरण पावले. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ५३,८६६ झाली आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९० टक्क्यांपर्यंत घटला आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २०,९६,६६४ वर पोहोचली आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,१२३, कर्नाटकमध्ये ४,३२७, दिल्लीमध्ये ४,२३५, आंध्र प्रदेशमध्ये २,९०६, गुजरातमध्ये २८३७, उत्तर प्रदेशमध्ये २,६३८, पश्चिम बंगालमध्ये २,५८१ व मध्य प्रदेशमध्ये १,१५९ आहे. देशात सध्या ६,८६,३९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाखांहून अधिक झाली होती.>लसीच्या साठेबाजीची चिंताजगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू असून, त्या यशस्वी झाल्यानंतरत्यांच्या संभाव्य साठेबाजीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोसअदनोम घेबियस यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रीमंत व विकसित देश कोरोनाची लस जास्त किमतीला खरेदी करून गरीब देशांना यापासून वंचितकरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

एकूण चाचण्या 3.26 कोटीइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९ आॅगस्ट रोजी ९,१८,४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील चाचण्यांची एकूण संख्या आता ३,२६,६१,२५२ इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या