शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

CoronaVirus News : धोका वाढला! देशात एका दिवसात ७० हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 05:42 IST

CoronaVirus News : रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ६९,६५२ नवे रुग्ण आढळून आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या आता २० लाख ९६ हजार झाली असून, अशा व्यक्तींचे प्रमाण ७३.९१ टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८,३६,९२५ वर पोहोचली असून गुरुवारी ९७७ जण या आजाराने मरण पावले. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ५३,८६६ झाली आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९० टक्क्यांपर्यंत घटला आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २०,९६,६६४ वर पोहोचली आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,१२३, कर्नाटकमध्ये ४,३२७, दिल्लीमध्ये ४,२३५, आंध्र प्रदेशमध्ये २,९०६, गुजरातमध्ये २८३७, उत्तर प्रदेशमध्ये २,६३८, पश्चिम बंगालमध्ये २,५८१ व मध्य प्रदेशमध्ये १,१५९ आहे. देशात सध्या ६,८६,३९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाखांहून अधिक झाली होती.>लसीच्या साठेबाजीची चिंताजगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू असून, त्या यशस्वी झाल्यानंतरत्यांच्या संभाव्य साठेबाजीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोसअदनोम घेबियस यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रीमंत व विकसित देश कोरोनाची लस जास्त किमतीला खरेदी करून गरीब देशांना यापासून वंचितकरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

एकूण चाचण्या 3.26 कोटीइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९ आॅगस्ट रोजी ९,१८,४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील चाचण्यांची एकूण संख्या आता ३,२६,६१,२५२ इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या