शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

CoronaVirus News: दिलासादायक! देशाचा मृत्युदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंत घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:42 IST

कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची योग्यवेळी होणारी चाचणी व उत्तम उपचार यामुळे १७ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंतखाली घसरला असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजेश भूषण यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील मृत्यूदर ८.०७ टक्के असून त्यापेक्षा तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मृत्यूदर कमी आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेश दररोज दर दहा लाखांमागे १४०हून अधिक कोरोना  चाचण्या करत आहेत. नुसत्या चाचण्या करून उपयोग नाही तर कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून प्रत्येक राज्याने प्रभावी उपाययोजनाही केली पाहिजे.

राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाने दररोज दर दहा लाख लोकांमागे १४० चाचण्या तरी करायलाच हव्यात. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करता येतील. या कृतीमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांवर आणता येईल. त्यानंतर हे प्रमाण ५ टक्के किंवा त्याहून कमी करण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी आणखी प्रयत्न करावेत.

केंद्रीय आरोग्य खात्याचे अधिकारी राजेश भूषण म्हणाले की, इतरांच्या तुलनेत भारताने कोरोना साथीचा अधिक चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. त्यासाठी देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे. 

जगात सर्वात कमी मृत्यू

भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे कोरोनाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण २०.४ टक्के असून ते जगातले सर्वात कमी प्रमाण आहे. असे अनेक देश आहेत की जिथे दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा २३ किंवा ३३ पट अधिक आहे. जागतिक पातळीवर दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे ७७ जण मरण पावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या