शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

CoronaVirus News: दिलासादायक! देशाचा मृत्युदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंत घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:42 IST

कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची योग्यवेळी होणारी चाचणी व उत्तम उपचार यामुळे १७ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंतखाली घसरला असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजेश भूषण यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील मृत्यूदर ८.०७ टक्के असून त्यापेक्षा तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मृत्यूदर कमी आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेश दररोज दर दहा लाखांमागे १४०हून अधिक कोरोना  चाचण्या करत आहेत. नुसत्या चाचण्या करून उपयोग नाही तर कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून प्रत्येक राज्याने प्रभावी उपाययोजनाही केली पाहिजे.

राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाने दररोज दर दहा लाख लोकांमागे १४० चाचण्या तरी करायलाच हव्यात. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करता येतील. या कृतीमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांवर आणता येईल. त्यानंतर हे प्रमाण ५ टक्के किंवा त्याहून कमी करण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी आणखी प्रयत्न करावेत.

केंद्रीय आरोग्य खात्याचे अधिकारी राजेश भूषण म्हणाले की, इतरांच्या तुलनेत भारताने कोरोना साथीचा अधिक चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. त्यासाठी देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे. 

जगात सर्वात कमी मृत्यू

भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे कोरोनाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण २०.४ टक्के असून ते जगातले सर्वात कमी प्रमाण आहे. असे अनेक देश आहेत की जिथे दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा २३ किंवा ३३ पट अधिक आहे. जागतिक पातळीवर दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे ७७ जण मरण पावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या