शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:06 IST

रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.

नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाचे ५७,९८१ नवे रुग्ण आढळून आल्याने या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९४१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या आजारातून आतापर्यंत १९,१९,८४२ लोक बरे झाले आहेत, तर रुग्णांची एकूण संख्या २६,४७,६६३ आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७२.५१ टक्के झाले आहे. या आजाराच्या एकूण बळींची संख्या ५०,९२१ वर पोहोचली आहे.सध्या देशामध्ये ६,७६,९०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९२ टक्के आहे. कोरोना आजाराबाबत भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. केंद्र व राज्य सरकारांनी दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेल्या वाढीमुळे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने काही निवडक जिल्ह्यांमध्ये केलेल्या सिरो सर्वेक्षणात मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमधील रहिवाशांत मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे प्रमाण बिहार, झारखंड, छत्तीसगढ या राज्यांमध्ये कमी आहे.>कोरोना चाचण्यांनी गाठला तीन कोटींचा पल्लाइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, १६ आॅगस्ट रोजी ७,३१,६९७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता तीन कोटींपेक्षा अधिक झाली आहे.३ कोटी ४१ हजार ४00इतकी त्यांची संख्या आहे. देशभरात ९६९ सरकारी प्रयोगशाळा व ५०० खासगी प्रयोगशाळांतून कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या