शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:06 IST

रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.

नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाचे ५७,९८१ नवे रुग्ण आढळून आल्याने या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९४१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या आजारातून आतापर्यंत १९,१९,८४२ लोक बरे झाले आहेत, तर रुग्णांची एकूण संख्या २६,४७,६६३ आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७२.५१ टक्के झाले आहे. या आजाराच्या एकूण बळींची संख्या ५०,९२१ वर पोहोचली आहे.सध्या देशामध्ये ६,७६,९०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९२ टक्के आहे. कोरोना आजाराबाबत भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. केंद्र व राज्य सरकारांनी दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेल्या वाढीमुळे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने काही निवडक जिल्ह्यांमध्ये केलेल्या सिरो सर्वेक्षणात मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमधील रहिवाशांत मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे प्रमाण बिहार, झारखंड, छत्तीसगढ या राज्यांमध्ये कमी आहे.>कोरोना चाचण्यांनी गाठला तीन कोटींचा पल्लाइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, १६ आॅगस्ट रोजी ७,३१,६९७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता तीन कोटींपेक्षा अधिक झाली आहे.३ कोटी ४१ हजार ४00इतकी त्यांची संख्या आहे. देशभरात ९६९ सरकारी प्रयोगशाळा व ५०० खासगी प्रयोगशाळांतून कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या