शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

CoronaVirus News : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:06 IST

coronavirus News in Marathi and Live Updates : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे.

- अमोल मचालेपुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक- अमोल मचाले।पुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या