शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

CoronaVirus News : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:06 IST

coronavirus News in Marathi and Live Updates : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे.

- अमोल मचालेपुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक- अमोल मचाले।पुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या