शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

CoronaVirus News : देशात १०,०३,८३२ कोरोना रुग्ण, मृत्युदर २.५ टक्क्क्यांवर, २४ तासांत ३४,९५६ नवे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:19 IST

CoronaVirus News : आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३४,९५६ नवे रुग्ण आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० लाखांवर गेली असली तरी त्यापैकी 6 लाख 35 हजर जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.शुक्रवारी आणखी एक विक्रम नोंदविला गेला तो म्हणजे कोरोनाच्या आजारातून २२,९४२ जण पूर्णपणे बरे झाले. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६,३५,७५७झाली असून ३,४२,४७३ कोरोना रुग्णांवरच सध्या उपचार सुरू आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.३३ टक्के इतके आहे.कमी बुद्धीचे लोक घालत नाहीत मास्ककोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, सतत हात धुणे आणि फिजिकल डिस्टंसिंग या गोष्टी आवश्यक आहेत. पण जे लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांची बौद्धीक क्षमता कमी असते.म्हणजे ते कमी बुद्धीमान असतात, असा निष्कर्ष यूनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्चमधून करण्यात आला. अशा लोकांकडे चूक किंवा योग्यचा निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नसते, असेही हा रिसर्च म्हणतो. या रिसर्चसाठी अमेरिकेतील ८५० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.राज्यात नऊ जिल्ह्यांत ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णमुंबई : कोरोनाचा केंद्रबिंदू आता मुंबईकडून अन्य महानगरांकडे सरकत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाण्यापाठोपाठ आता पुण्यानेही मुंबईला मागे टाकले आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ३३६ रुग्ण राज्यातील नऊ जिल्ह्यांत असून उर्वरित सर्व जिल्ह्यांत मिळून फक्त ८१४४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८,३०८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.६४० पैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये रुग्णलॅन्सेट ग्लोबलच्या अहवालानुसार देशाचा ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात असून, ६४० जिल्ह्यांपैकी ६२७जिल्ह्यांमध्ये रुग्ण आहेत.कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणे आवश्यक आहे, असेलॅन्सेटने म्हटले आहे.मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा व गुजरात या ९ राज्यात स्थिती चिंताजनक आहे. ईशान्य भारतामधील स्थिती तुलनेने चांगली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य