शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

Coronavirus: कोरोनाबाबत जारी झाली नवी नियमावली, आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणीची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 18:38 IST

Coronavirus in India: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Coronavirus in India) देशातील काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. तर काही राज्यांमध्ये चिंता कायम आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची नवी नियमावली जारी झाली असून, आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची गरज नाही, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. (no need for RT-PCR test to travel from one state to another)

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संबोधित करताना सांगितले की, कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांमध्ये राज्यवार घट दिसून येत आहे.  २६ राज्यांमध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर सहा राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार येछे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरात येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नियमावलीबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. तसेच कोरोनाचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जाणार असेल तर त्यालाही आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. म्हणजेच रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसेल.  

देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम चालवली जात आहे. मात्र सध्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य