शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाबाबत जारी झाली नवी नियमावली, आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणीची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 18:38 IST

Coronavirus in India: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Coronavirus in India) देशातील काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. तर काही राज्यांमध्ये चिंता कायम आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची नवी नियमावली जारी झाली असून, आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची गरज नाही, असे या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. (no need for RT-PCR test to travel from one state to another)

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संबोधित करताना सांगितले की, कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांमध्ये राज्यवार घट दिसून येत आहे.  २६ राज्यांमध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर सहा राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार येछे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरात येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नियमावलीबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. तसेच कोरोनाचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जाणार असेल तर त्यालाही आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. म्हणजेच रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसेल.  

देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम चालवली जात आहे. मात्र सध्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य