शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus: सौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांसाठी सरकारची नवी नियमावली, करावे लागेल या सूचनांचे पालन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:25 IST

coronavirus in India : देशात सापडत असलेल्या कोरोनाबाधितांपैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देसौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली ज्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत वा लक्षणे दिसत नाही आहेत, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेलअशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना होम क्वारेंटाइन व्हावे लागेल

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. (coronavirus in India) मात्र यापैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार ज्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत वा लक्षणे दिसत नाही आहेत, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. तसेच अशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना होम क्वारेंटाइन व्हावे लागेल. (New guidelines issued by the government for mild and asymptomatic corona patients, must be followed)

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अशा कोरोनाबाधित रुग्णावर घरीच उपचार करावे लागतील. तसेच बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठीची नियमावली पुढील प्रमाणे आहे. 

- ज्या रुग्णांना एचआयव्ही, कॅन्सरसारखे गंभीर आजार असतील किंवा अवयव प्रत्यारोपण झाले असेल अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये राहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- जे रुग्ण ६० वर्षांवरील वयाचे आहे. तसेच ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनीसुद्धा होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्यावी. - कुटुंबातील जी व्यक्ती रुग्णाची काळजी घेईल. तसेच त्याचा निकट संपर्कात असेल अशांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलनुसार एचसीक्यू घ्यावे लागेल.- होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांना क्रॉस व्हेंटिलेशन असलेल्या खोलीत ठेवावे. तसेच खोलीची खिडकी उघडी ठेवावी. तसेच रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क वापरावा. तसेच हा मास्क दर आठ तासांनी बदलावा.-रुग्णाची देखभाल सुरू असलेल्या खोलीत प्रवेश करताना संबंधित व्यक्तीने एन-९५ मास्क वापरला पाहिजे. मास्क बदलायचा असेल तर तो १ टक्का सोडियम हायपोक्लोराइटसोबत मास्क डिस इन्फेक्ट केल्यावर तो फेकून द्यावा. - होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णाच्या भोजनात अधिकाधिक पातळ पदार्थांचा समावेस करावा. तसेत घरी राहणाऱ्यांना अधिकाधिक आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. - ब्लड ऑक्सिजन सेचुरेशनला मॉनिटर करण्यासाठी प्लस ऑक्सिमीटरचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासह दररोज दर चार तासांनी शरीराचे तापमान तपासणे आवश्यक आहे. - रुग्णाला एकाच खोलीत राहावे लागेल. तसेच त्याने कुटुंबातील अन्य व्यक्तींपासून आवश्यक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याने वयस्कर आणि आजारी व्यक्ती आपल्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. - रुग्णाने अधिकाधिक आराम करावा. तसेच शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. रुग्णाने खोकताना तसेच शिंकताना विशेष खबरदारी घ्यावी. प्रत्येकवेळी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. - रुग्णाने दिवसातून दोनवेळा कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. तसेच वाफ घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. - रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांच्या खाली आली असेल, छातीत वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - कोरोनाचे लक्षण समोर आळ्यानंतर किमान दहा दिवसांनंतर होम आयसोलेशन संपुष्टात आणण्यात येऊ शकते. मात्र सलग तीन दिवस ताप येत नसेल तरच असा निर्णय घेता येऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत