शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे? केंद्र सरकारने दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:23 IST

Coronavirus : देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडूनही लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. 

लॉकडाऊनसारख्या उपायांवर चर्चा सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोलोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जाणार का, असा प्रश्न विचारला असता नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जर गरज भासली तर त्या पर्यायांवरही चर्चा होते. २९ एप्रिल रोजी राज्यांना सविस्तरपणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाची चेन तोडण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीसह सर्वप्रकारच्या निर्बंधांबाबत सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, काल देशभरात कोरोनामुळे तब्बल तीन हजार ७८० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर काल देशामध्ये ३ लाख ८२ हजार ३१५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली आहे. 

सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी १६.८७ टक्के एवढे आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही ८२.०३ टक्के आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ एवढी झाली आहे. तर देशातील मृत्युदर घटून १.०९ टक्के झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार