शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे? केंद्र सरकारने दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:23 IST

Coronavirus : देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांचे निदान होत असून, तीन हजारांहून अधिक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडूनही लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. 

लॉकडाऊनसारख्या उपायांवर चर्चा सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोलोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला जाणार का, असा प्रश्न विचारला असता नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जर गरज भासली तर त्या पर्यायांवरही चर्चा होते. २९ एप्रिल रोजी राज्यांना सविस्तरपणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाची चेन तोडण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीसह सर्वप्रकारच्या निर्बंधांबाबत सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, काल देशभरात कोरोनामुळे तब्बल तीन हजार ७८० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर काल देशामध्ये ३ लाख ८२ हजार ३१५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली आहे. 

सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी १६.८७ टक्के एवढे आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही ८२.०३ टक्के आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ एवढी झाली आहे. तर देशातील मृत्युदर घटून १.०९ टक्के झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार