शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

CoronaVirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलाने कसली कंबर, १४ युद्धनौका सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:41 IST

कोरोनामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय विविध देशाच अडकून पडले आहेत. दरम्यान, आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआखाती देशातील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहेया मोहिमेसाठी नौदलाने कंबर कसली असून, यासाठी नौदलाने १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.यापैकी चार युद्धनौका पश्चिम कमांड, चार युद्धनौका ईस्टर्न कमांड आणि तीन युद्धनौका दक्षिण कमांडमध्ये आहेत.’

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला असल्याने बहुतांश भागातील प्रवासी वाहतूक बंद आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय विविध देशाच अडकून पडले आहेत. दरम्यान, आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली आहे. आखाती देशातील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नौदलाने कंबर कसली असून, यासाठी नौदलाने १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.

याबाबत माहिती देताना नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘आम्ही आखाती देशांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. यामधील चार युद्धनौका पश्चिम कमांड, चार युद्धनौका ईस्टर्न कमांड आणि तीन युद्धनौका दक्षिण कमांडमध्ये आहेत.’

 दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा फटका नौदलालाही बसला आहे. त्याबाबत माहिती देताना कुमार यांनी सांगितले की,’मुंबईतील आएएनएस आंग्रे येथील ३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पैकी १२ जणांना इलाजानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २६ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र आमच्या कुठल्याही युद्धनौकेत किंवा पाणबुडीमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही.’

दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत