शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलाने कसली कंबर, १४ युद्धनौका सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:41 IST

कोरोनामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय विविध देशाच अडकून पडले आहेत. दरम्यान, आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआखाती देशातील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहेया मोहिमेसाठी नौदलाने कंबर कसली असून, यासाठी नौदलाने १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.यापैकी चार युद्धनौका पश्चिम कमांड, चार युद्धनौका ईस्टर्न कमांड आणि तीन युद्धनौका दक्षिण कमांडमध्ये आहेत.’

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला असल्याने बहुतांश भागातील प्रवासी वाहतूक बंद आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय विविध देशाच अडकून पडले आहेत. दरम्यान, आखाती देशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली आहे. आखाती देशातील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नौदलाने कंबर कसली असून, यासाठी नौदलाने १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.

याबाबत माहिती देताना नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘आम्ही आखाती देशांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी १४ युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. यामधील चार युद्धनौका पश्चिम कमांड, चार युद्धनौका ईस्टर्न कमांड आणि तीन युद्धनौका दक्षिण कमांडमध्ये आहेत.’

 दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा फटका नौदलालाही बसला आहे. त्याबाबत माहिती देताना कुमार यांनी सांगितले की,’मुंबईतील आएएनएस आंग्रे येथील ३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पैकी १२ जणांना इलाजानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २६ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र आमच्या कुठल्याही युद्धनौकेत किंवा पाणबुडीमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही.’

दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत