शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:44 IST

Coronavirus in India:

नवी दिल्ली - गेल्या सव्वा वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत चार लाखांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (Coronavirus in India) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमएला सांगितले की, किमान मोबदला देता येईल अशी एक व्यवस्था बनवण्यात यावी.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे मृत्यू प्रमाणपत्र केंद्र सरकारने जारी करावेत. तसेच जी प्रमाणपत्रे आधीच जारी झाली आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. तसेच यावर सुनावणी करताना केंद्र सरकारने एनडीएमएच्या अधिकाऱ्यांना फटकारही लगावली.

या प्रकरणी अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या याचीकांमधून करण्यात आली होती. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून कोविड डेथ सर्टिफिकेटबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडे उत्तर मागितले होते.

मात्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जे शपथपत्र देण्यात आले त्यामध्ये असे करण्यास केंद्र सरकारकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, असे करणे शक्य नाही, त्यापेक्षा सरकारकडून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार लाख रुपयांची मदत ही कुठल्याही आपत्तीच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. मात्र कुठल्याही साथीच्या वेळी अशी मदत देणे शक्य होत नाही.  

भारतात गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या साथीमुळे देशाच आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर या साथीचा प्रभाव आता काहीसा कमी होऊ लागला आहे. मात्र अजूनही देशात दररोज चाळीस हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय