शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:44 IST

Coronavirus in India:

नवी दिल्ली - गेल्या सव्वा वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत चार लाखांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (Coronavirus in India) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमएला सांगितले की, किमान मोबदला देता येईल अशी एक व्यवस्था बनवण्यात यावी.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे मृत्यू प्रमाणपत्र केंद्र सरकारने जारी करावेत. तसेच जी प्रमाणपत्रे आधीच जारी झाली आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. तसेच यावर सुनावणी करताना केंद्र सरकारने एनडीएमएच्या अधिकाऱ्यांना फटकारही लगावली.

या प्रकरणी अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या याचीकांमधून करण्यात आली होती. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून कोविड डेथ सर्टिफिकेटबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडे उत्तर मागितले होते.

मात्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जे शपथपत्र देण्यात आले त्यामध्ये असे करण्यास केंद्र सरकारकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, असे करणे शक्य नाही, त्यापेक्षा सरकारकडून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार लाख रुपयांची मदत ही कुठल्याही आपत्तीच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. मात्र कुठल्याही साथीच्या वेळी अशी मदत देणे शक्य होत नाही.  

भारतात गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या साथीमुळे देशाच आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर या साथीचा प्रभाव आता काहीसा कमी होऊ लागला आहे. मात्र अजूनही देशात दररोज चाळीस हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय