शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:44 IST

Coronavirus in India:

नवी दिल्ली - गेल्या सव्वा वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत चार लाखांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (Coronavirus in India) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमएला सांगितले की, किमान मोबदला देता येईल अशी एक व्यवस्था बनवण्यात यावी.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे मृत्यू प्रमाणपत्र केंद्र सरकारने जारी करावेत. तसेच जी प्रमाणपत्रे आधीच जारी झाली आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. तसेच यावर सुनावणी करताना केंद्र सरकारने एनडीएमएच्या अधिकाऱ्यांना फटकारही लगावली.

या प्रकरणी अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या याचीकांमधून करण्यात आली होती. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून कोविड डेथ सर्टिफिकेटबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडे उत्तर मागितले होते.

मात्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जे शपथपत्र देण्यात आले त्यामध्ये असे करण्यास केंद्र सरकारकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, असे करणे शक्य नाही, त्यापेक्षा सरकारकडून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार लाख रुपयांची मदत ही कुठल्याही आपत्तीच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. मात्र कुठल्याही साथीच्या वेळी अशी मदत देणे शक्य होत नाही.  

भारतात गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या साथीमुळे देशाच आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर या साथीचा प्रभाव आता काहीसा कमी होऊ लागला आहे. मात्र अजूनही देशात दररोज चाळीस हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय