शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: लग्नात जमली ५००हून अधिक लोकांची गर्दी, पोलिसांनी व-हाड्यांना मारायला लावल्या बेडूक उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:49 IST

Coronavirus: कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे.

भोपाळ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे. अशा कारवाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनाचे नियम मोडून आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या व-हाडी मंडळींना पोलीस बेडूक उड्या मारण्याची शिक्षा देत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या लग्नसोहळ्यातील वरासह मंडपाच्या मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ही घटना मध्य प्रदेशातील भिंड येथील उमरी गावात घडली आहे. भिंडमधील उमरी येथे आदिवासी कल्याण विभागाच्या वसतीगृहात बुधवारी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण ५००हून अधिक लोकांना देण्यात आले होते. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे ३००हून अधिक लोक उपस्थित होते. 

पोलीस आल्याची चाहूल लागताच विवाह स्थळावर पळापळ सुरू झाली. मात्र काही लोकांना पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बेडूक उड्या मारायला लावल्या. तसेच वरपक्षाच्या मंडळींना नियमभंग केल्याप्रकरणी चांगलाच दम दिला. यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका शेताच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अनेक लोकांना बेडूक उड्या मारायला लावत असल्याचे दिसत आहे. तसेच व्यवस्थित बेडूक उड्या मारत नसलेल्या एका व्यक्तीवर पोलीस दंडुक्याचा प्रहार करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्याची खूप चर्चा होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश