शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Coronavirus: केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना; सर्वत्र सारखेच नियम आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 08:54 IST

Coronavirus: आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांतील चार मुद्द्यांबाबत केंद्राने आपल्या पत्रात भर दिला आहे. (१) कोणत्याही देशातून आलेला प्रवासी असो, त्याची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी. (२) ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना सक्तीच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, तिचा निष्कर्ष निगेटिव्ह आला तरच या प्रवाशांना पुढील प्रवासाची परवानगी द्यावी; त्याशिवाय इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची प्रवास सुरू करण्याच्या ४८ तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे आवश्यक आहे; या मुद्द्यावरही केंद्र सरकारच्या पत्रात भर देण्यात आला आहे.

समान धोरणाची दिली ग्वाहीकेंद्राने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच भविष्यातील उपाययोजनांच्या प्रमाणेच आमचे धोरण असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने  दिली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यानेही कडक पावले उचलण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस