शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

Coronavirus: केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना; सर्वत्र सारखेच नियम आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 08:54 IST

Coronavirus: आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांतील चार मुद्द्यांबाबत केंद्राने आपल्या पत्रात भर दिला आहे. (१) कोणत्याही देशातून आलेला प्रवासी असो, त्याची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी. (२) ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना सक्तीच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, तिचा निष्कर्ष निगेटिव्ह आला तरच या प्रवाशांना पुढील प्रवासाची परवानगी द्यावी; त्याशिवाय इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची प्रवास सुरू करण्याच्या ४८ तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे आवश्यक आहे; या मुद्द्यावरही केंद्र सरकारच्या पत्रात भर देण्यात आला आहे.

समान धोरणाची दिली ग्वाहीकेंद्राने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच भविष्यातील उपाययोजनांच्या प्रमाणेच आमचे धोरण असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने  दिली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यानेही कडक पावले उचलण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस