शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

Coronavirus: दाहकता! ७ महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालायचंय; मजुरांची अवस्था पाहून काळजात धस्स होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 13:17 IST

राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे शेकडो मजुरांची दयनीय अवस्थाकंपन्या बंद पडल्याने मजूर गावाकडे चाललेमजुरांची भीषण अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक मालकांनी त्यांच्या मजुरांना कामबंद करण्याची सूचना दिली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा लॉकडाऊन आवश्यक असला तरी त्याची दुसरी भीषण बाजू समोर येऊ लागली आहे. गुरुग्राममध्ये नोकरी करणाऱ्या राजकुमारसोबत हा अनुभव येत आहे. त्याच्या मालकाने त्याला घरी जायला सांगितल्यानंतर तो घरी जाण्यास निघाला.

राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही. यातच गुरुग्रामला बसून काहीच होणार नाही. पण याठिकाणाहून जाण्याचंही साधन नाही. राजकुमारने पत्नी, तीन महिन्याचा मुलगी आणि ५८ वर्षीय आईला घेऊन बुधवारी सकाळी गावाकडे जाण्यासाठी पायपीट सुरु केली. त्याच्यासारखे हजारो लोक रस्त्यावरुन चालत त्यांच्या गावी जात आहेत. राजकुमार यांनी दिवसभरात दिल्लीत पार करुन ५० किमी अंतर गाठलं होतं. काही स्थानिकांच्या मदतीने त्यांना जेवणाची पाकीटं मिळाली. रस्त्यावर पायपीट करणारे लोक पुढे चालत असतात, कोणतीतरी गाडी मिळेल हीच अपेक्षा त्यांना असते.

दिल्लीच्या एनसीआरमधून अचानक निघालेल्या लोकांची ही गर्दी हायवेवर पाहायला मिळते. जे लोक गावाकडे जायला निघालेत. हे कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. कंपन्या बंद पडल्याने एका क्षणात हे सगळे बेरोजगार झालेत. या लोकांचे गावाकडे पलायन करणं सरकारसाठीही चिंतेचा विषय बनलं आहे. लॉकडाऊनचा अर्थ लोकांना धोक्यात घालणं नसून लोकांची गर्दी रोखणं हे आहे.

बुधवारी संध्याकाळपर्यंत गाझियाबादला पोहचलेल्या राजकुमारने सांगितले की, लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं. कंपनी मालकाने घरी जाण्यास सांगितले. पण घराचं भाडं कसं देणार? गावाकडे परतण्याखेरीज माझ्याकडे काहीच इलाज नाही. सर्व पूर्वपदावर आल्यानंतर मालकाचा कॉल येईल तेव्हा परत जाईन असं तो म्हणाला. तर मनोज ठाकूर हा गाझियाबादच्या वैशालीमध्ये एका कारखान्यात काम करतो. आनंद विहार बस टर्मिनलमधून त्यांना बस न मिळाल्याने १० तास चालत ते दादरी येथे पोहचले. दुपारी ३ वाजता चालण्यास सुरुवात केली त्यानंतर रात्री १ वाजता दादरी येथे पोहचलो. माझ्याकडे जेवणाचं पाकीट आहे पण पाणी नाही. हायवेवर एकही दुकान नाही. मनोजला यूपीतल्या एटा जिल्ह्यातील घरी पोहचायचा आहे. अजूनही १६० किमी चालायचं आहे.

सात महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालण्याची तयारी

अजमेरच्या ओमप्रकाश कुशवाहा यांची सात महिन्याची मुलगी आहे. त्यांना वाटेत कोणतीही गाडी सापडली नाही तर त्यांना घरी पोहचण्यासाठी सुमारे आठवडाभर चालत जावे लागणार आहे. गुरुवारी अशा लोकांची गर्दी दिल्ली-जयपूर महामार्गावरुन आपापल्या घराकडे जात होती. सर्वांकडे सामना, लहान मुलं आहेत. बर्‍याच जणांची एकच तक्रार आहे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी आधी सांगितलं का नाही?  फरीदाबादपासून 550 कि.मी. अमेठीला चालत निघालेले प्रताप गुप्ता म्हणाले,आम्हाला जर पूर्वी माहित असते तर आम्हाला चालत जाण्याची गरज पडली नसती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी